माझे अंतरंग
लेखकाच मनोगत
म्हणतात ना लोणचं जेवढ जुन तेवढ ते जास्त मुरत आणि जास्त चवदार होत. कदाचित लिखानाच्या बाबतीतही तसच असाव. २००३ पासुन लिखानाला सुरुवात केली. वही, डायरी,Orkut Community, ब्लॅाग, फेसबुक पेज, गृप असा प्रवास आता तब्बल १४ वर्षानंतर येवुन पोहोचलाय ई बुक पर्यंत. पहिल पुस्तक प्रकाशित करताना कल्पना नव्हती नेमक पुस्तक कस असावं, डिजाईन कशी तयार करावी. विषय अगोदरच ठरला होता दुर्गवीर प्रतिष्ठान सोबतचे दुर्गसंवर्धन व दुर्गदर्शन बाबतचे सर्व हसरे, हळवे, मनाला चटके देणारे सर्व अनुभव मांडायचे. समिर शिंदे सारख्या मित्राने डिजाईन पासुन प्रिंट पर्यंत सर्व जबाबदारी अंगावर घेतली त्यामुळे मला लिखान, संपादन या गोंष्टिंवर लक्ष देवु शकलो. ब-याच जुन्या गोष्टिंची उजळणी करुन नव्याने मांडल्या. नुसती पान वाढविण्यापेक्षा थोडक्यात मुद्दा मांडायचा होता. प्रत्येक लेखातुन फक्त मी व्यक्त होण आवश्यक नव्हत तर तर वाचकाला काहि ना कहि द्यायचा प्रयत्न होता. प्रत्येक लेखातुन एक तर खळखळुन हसवायच किंवा गडाची किंवा समाजातील व्यवस्था मांडुन जागरुकता निर्माण करायचा प्रयत्न केलाय. प्रत्येक शब्द आजबाजुच्या घटनेला धरुन होता कुठेही अतिशयोक्ति नव्हती.
जे जमल जितक जमल ते मांडल. उगाचच मोठ मोठ्या उपमांचा वापर करुन अलंकारीत पुस्तकापेक्षा जे मनात आल ते तुमच्या मनापर्यंत पोहोचविण्याचा माझा हा “चिंटुकला” प्रयत्न कसा वाटला ते नक्कि कळवा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी एक शिकवण असेल पुढच्या माझ्या इतर विषयांवरील प्रयत्नांसाठी.
धन्यवाद
जय शिवराय
धिरज विजय लोके (दुर्गवीर चा धिरु)
Reviews
There are no reviews yet.