मराठी
Showing 71–80 of 93 results
-
मैत्री: एक ड्राफ्ट भावनांचा
-
मोडी लिपी – शिका सरावातून
₹299.00मनोगत
नाइट कॉलेज, कोल्हापूरच्या मोडी वर्गामध्ये मोडी लिपी शिकत असताना एक बाब माझ लक्षात आली की, मोडी अक्षरे लिहिण्यास अवघड आहेत. त्या अक्षरांचा सराव असेल तरच ती लिहिता येऊ शकतात, हे लक्षात आल्यावर मी अक्षरे सरावासाठीचा कित्ता शोधला, पण तसे कित्ता पुस्तक उपलब्ध नाही, ही माहिती मोडीतज्ञाकडून मिळाली. पण मोडी लिपी शिकण्याठी सराव महत्वाचा आहे. मी संगणकावरील मोडी अक्षरांची प्रिंट काढून सराव केला व माझ्यापरीने सरावाचा प्रश्न सोडविला. सदरची बाब प्रा. अरुण शिंदे सरांच्या धनात आली. त्यांनी सुचवले की असे कित्ता पुस्तक नव्याने मोडी शिकणार्यासाठी गरजेचे व उपुक्त आहे. यातूनच असे कित्ता पुस्तक आपण लिहावे, अशी प्रेरणा माझ्या मनात निर्माण झाली. यासाठी मोडीचा माँट श्री लिपी (मॉड्युलर इन्मोटेक प्रा. लि., पुणे) यांच्याकडून तयार करून घेतला. पुस्तकासाठी काम करणची ही माझी पहिलीच वेळ असल्याने प्रत्येक गोष्ट नीटपणे समजून घेऊन, झपाटून कामास लागलो व अनेक पातळ्यावर सतत काम करीत सदर कित्ता पुस्तक पूर्ण केले.
सदरच्या पुस्तकात मराठी वर्णमालेबरोबर मोडी वर्णमाला आहे. तसेच मराठी अक्षरांचे इंग्रमजीतील पर्यायही दिले आहेत. अमराठी लोकांना मोडी लिपीचा परिचय होऊन त्यांना मोडी लिपीचे ज्ञान आत्मसात करण्यास इंग्रजी अक्षरांमुळे मदत होईल. इंग्रजीमधून मराठी अक्षर व त्या मराठी अक्षराची मोडी लिपीमध्ये लिहिण्याची पद्धत व सरावासाठी मोकळी जागा पुस्तकामध्ये दिलेली आहे. पुस्तकातील प्रत्येक मराठी शब्दाचे इंग्रजी भाषेत स्पेलींग दिले आहे. यामुळे अमराठी भाषिकांना या पुस्तकाद्वारे मोडी लिपी शिकण्यास मदत होईल. मराठीतील स्वर, व्यंजने, बाराखडी मोडी लिपीत कशी लिहावीत, हे सोप्या पद्धतीने समजावून दिले आहे. स्वर, व्यंजने व बाराखडीमधील कठीण अक्षरे यांचा जास्तीत जास्त सराव व्हावा म्हणून सरावासाठी रिकामी जागा दिली आहे. तसेच काना-मात्रा विरहित शब्द, काना-मात्रा असलेले शब्द, उकार-वेलांटी असलेले शब्द, त्यांचे इंग्रजी स्पेलींग व ते मोडी लिपीत कसे लिहावे हे दिले आहे. त्याच्यापुढे सरावासाठी जागा उपलब्ध आहे.काही मोडी अक्षरांचे मोडी लिपीत लिहिण्याचे विविध प्रकार दिलेले आहेत. मोडी लिपीमध्ये अनेक शब्दसंक्षेप वापरले जातात. त्यांचीही माहिती पुस्तकात आहे. मोडी लिपीची अक्षरे आपण सरावाने लिहू शकतो. पण पूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज वाचताना आपल्याला बर्याच बाबींची काळजी घ्यावी लागते. मोडी लिपी वापरात असताना कोरे कागद असत. त्यामुळे कागदाच्या डाव्या बाजूपासून उजव्या बाजूपर्यंत एक शिरोरेषा काढून मोडीत लिहिण्यास सुरुवात केली जाई. मोडी लिपीत कोणत्याही प्रकारचे व्याकरणाचे नियम नसल्याने, ऐतिहासिक कागदपत्रांचे वाचन काळजीपूर्वक करावे लागते. लिहिलेल्या मजकुराचे तारतम्याने व संदर्भ समजून घेऊन वाचन केल्यास दस्तऐवजांचा अर्थ लागण्यास सोपे जाते.
– नवीनकुमार माळी
-
यशपुष्प- डॉ. आशुतोष रारावीकर
Sale!₹150.00₹100.00मी लिहिलेल्या विचारपुष्पांचं हे पुस्तक आज आपल्यापुढे सादर करतांना मला विलक्षण आनंद होत आहे. सागरमंथनातून मोती निघाले असं म्हणतात. ह्या पुस्तकातील मोती माझ्या विचारमंथनातून वर आले आहेत. ते अंत:प्रेरणेतून स्फुरलेले आहेत, मुद्दाम बनवलेले नाहीत. विचार हा मोठा आनंद असतो आणि आनंदाची देवाणघेवाण तर झालीच पाहिजे. कारण तो दिल्याने वाढतो. याच उद्देशाने ह्या पुस्तकाचं सादरीकरण करतो आहे. हे वाचतांना प्रसन्नतेचे काही तरंग आणि तुषार जरी आपल्या चित्ती फुलले आणि काही स्मितरेषा आपल्या चेहेऱ्यावर उमटून गेल्या तरी त्याचं सार्थक झालं असं मी समजेन.
माझे वडील प्रा. डॉ. यशवंत रारावीकर हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ होते. ते सात्विकतेची आणि करुणेची मूर्तिमंत प्रतिमा होते. माझी आई प्रा. डॉ. सौ. अरुणा रारावीकर ही एक अध्यात्म मूर्ती, संस्कृततज्ज्ञ आणि साहित्यिक होती. ती साक्षात चालतीबोलती भगवद्गीता होती, शत-प्रतिशत सप्तशती होती. या जगात पाऊल टाकल्यानंतर तिनेच मला पहिल्यांदा बोलायला शिकवलं. माझ्या आई -दादांनी माझ्या जीवनाला ‘अर्थ’ही दिला आणि जीवनाचं ‘शास्त्र’ही शिकवलं. आयुष्याच्या अर्थशास्त्राची पारायणं मी त्याच्या कुशीत केली.अर्थशास्त्र हा माझा श्वास आहे तर अध्यात्म हा माझा प्राण आहे. इतकी वर्षे मी वडिलांची म्हणजे अर्थशास्त्राची भाषा बोललो. या पुस्तकातून आता मी आईची भाषा बोलतो आहे. माझ्या आई-वडिलांनी मला भाषा आणि विचार या दोन्हींची देणगी दिली. त्यांनी मला भाषा आणि जीवन या दोन्हींची शुद्धता शिकवली. आज हा छोटा ग्रंथोबा मी त्यांच्या चिरंतन स्मृतींना अर्पण करत आहे.
मी माझ्या आई-वडिलांच्या नावामागे कैलासवासी कधीही लावत नाही कारण माझ्या अंतकरणात त्यांचा सदैव वास असतो. पुस्तकावर एक औपचारिकता म्हणून लेखकाचा – म्हणजे माझा परिचय छापला गेला आहे. पण मी माझ्या आईवडिलांचा मुलगा आहे हीच माझी सर्वात मोठी ओळख. आणि तोच मला मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार. माझ्या वडिलांचं नाव यशवंत आणि आईचं माहेरचं नाव पुष्पा. म्हणून या पुस्तकाचं नाव ‘यशपुष्प’.
लहानपणापासून आजोबा आणि शेजारी या दोन्ही नात्यांमधून कुसुमाग्रजांच्या प्रदीर्घ सहवासातून झालेला साहित्याचा परिसस्पर्श मला प्रकर्षाने आठवतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकल्यापासूनचे माझे दोन आध्यात्मिक भाग्यगुरू – गुरुवर्य परम पूजनीय श्री. नारायणकाका ढेकणे महाराज आणि माझे गुरुजी तसेच पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे योगगुरू डॉ. एच. आर. नागेंद्रजी (कुलपती, स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान) यांच्या ईश्वरी छायेत सुरु झालेला माझा प्रवास आज एका विलक्षण वळणावर येऊन पोहोचला आहे. प्रसन्न चैतन्यमूर्ती आदरणीय विष्णूमहाराज पारनेरकर यांनाही माझी वंदना.
माझ्या वडिलांचे परममित्र आणि साहित्यपंढरीत विठोबाचं स्थान असलेल्या तसेच रामदास स्वामींच्या ‘उत्तम’ पुरुषलक्षणांमध्ये बसणाऱ्या पत्रमहर्षी उत्तमरावांनी प्रस्तावना लिहिली हा मोठा आनंद. माझी पत्नी वीणा हिची संसाराच्या मैफलीतली सुरेल साथ आणि चिरचैतन्य देणारा आमचा मुलगा मिहिर या माझ्या जीवनप्रवाहातल्या साथीदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. ब्रोनॅटो आणि किंडल, ज्यांच्यामुळे या कलाकृतीला सूर्यप्रकाश दिसला आहे, त्यांचे मन:पूर्वक आभार.ही माझी शब्दप्रार्थना आणि भाववंदना कुलस्वामिनी श्री यल्लम्माईच्या पवित्र चरणांवर कृतज्ञतापूर्वक समर्पित करतो.
डॉ. आशुतोष रारावीकर
१६ जुलै, २०२०
मुंबई. -
रश प्रिंट- विनय बहुलेकर
Sale!₹201.00₹151.00चित्रपट विश्वाच्या पार्श्वभूमीवर लिहीलेल्या माझ्या ह्या नव्या पुस्तकाचे नाव आहे ‘रश प्रिंट.’
कुठलाही चित्रपट सलग चित्रित होत नाही. तो तुकड्या-तुकड्यांनी चित्रित होत असतो. चित्रपटातील एखाद्या सीनचा जरी विचार केला तरी तो सलग चित्रित होत नाही. कथेच्या प्रवाहातील काही नंतरचे शॉट्स आधी चित्रित होतात काही आधीचे शॉट्स नंतर … त्या नंतर चित्रित झालेले सर्व शॉट्स पटकथे बरहुकूम जोडतात. त्यावेळी त्यावर एडिटिंग, डबिंग आणि साऊंड मिक्सिंग आदी प्रक्रिया केल्या जातात व नंतर जी काही प्रिंट मिळते ती ‘फायनल प्रिंट’. त्यावरुन ‘मास्टर प्रिंट’ काढतात आणि त्यावरुन आणखी प्रती काढल्या जातात ज्या आपण सिनेमा गृहात चित्रपट रुपाने पहातो…
परंतु चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होण्याच्या आगोदर चित्रित झालेले हे शॉट्स, ज्यांना कुठलाही सिक्वेन्स नसतो आणि ज्याच्यावरुन चित्रपटाचे कथानक समजू शकत नाही; अशा ह्या शॉट्सच्या फिल्मवर केवळ रासायनिक प्रक्रिया झालेल्या असतात. त्यावर अन्य कुठलेही संस्कार झालेले नसतात. ह्या विस्कळीत शॉट्स चा एकत्र संग्रह म्हणजे ‘रशेस’. आणि हे ‘रशेस’ पहाण्यासाठी त्याची एकत्रित प्रिंट काढली जाते त्याला ‘रश प्रिंट’ म्हणतात. जी चित्रपट निर्मितीत अपरिहार्य असते. ह्या वरुन त्यानिर्माणाधीन चित्रपटाचा दर्जा लक्षात येतो. प्रत्येक शॉट वाईज त्याचा बारकाईने अभ्यास होतो…
हल्ली उत्तम दर्जाचे व्हिडीओ कॅमेरे चित्रीकरणासाठी वापरले जातात. त्यावरच्या मॉनिटर वरुन काय आणि कसं चित्रित झालं आहे रंग-संगती कशी जमली आहे इ. गोष्टी साऱ्या चित्रीकरण स्थळीच तपासल्या जातात.
‘रश प्रिंट’ म्हणजे चित्रपट नव्हे आणि ट्रेलर तर नव्हेच नव्हे. ट्रेलर म्हणजे जाहिरातीचा भाग, तर ‘रश प्रिंट’ म्हणजे अभ्यासाचा भाग. माझ्या ह्या चित्रपट पार्श्वभूमीच्या ह्या लेख मालिकेला सिक्वेन्स नाही. …चित्रपट क्षेत्रातील माझ्या निकटच्या श्रेष्ठ व्यक्तींवर मी हे लेख लिहिले. –पण माझं किंवा त्या सेलिब्रेटीजची ही आत्मचरित्रे नव्हेत. त्यांचे अल्प-स्वल्प अनमोल सहवास मला मिळाले, काही दुर्मिळ प्रसंग अनुभवायला मिळाले ते पुस्तकातून आपल्या बरोबर शेअर करावेसे वाटले म्हणून ते ह्या लेख मालिकेतून आपल्या समोर मांडले. एखाद्या सुंदर चित्रपटाच्या सुंदर रशेस सारखे मी ते अनुभवले. …
…तेव्हा ही ‘रश प्रिंट’ सर्व वाचकांनी पहावी आणि ह्या वेगळ्या प्रकारच्या ‘रश प्रिंट’चा भरपूर आनंद लुटावा, ही मनापासूनची इच्छा!…
आभार!
-विनय बहुलेकर. -
राजर्षी शाहु छत्रपती महाराज
₹100.00लिप्यंतरकाराचे मनोगत
‘राजर्षी शाहु छत्रपती महाराज’ हे मोडी लिपीतील पहिले शाहु चरित्र वाचकांसमोर ठेवताना मला अतिशय आनंद व अभिमान वाटत आहे. मोडी वाचकासांठी व मोडी प्रचार प्रसारासाठी हे चरित्र मैलाचा दगड ठरेल असा मला विश्वास वाटतो. मी माझे मोडी शिक्षण ऊदयसींह राजेयादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण केले. मोडी शिकताना मूळाक्षरे, बाराखडी, शब्द, वाक्य मी सहज शिकलो पण मोडीतील हस्तलिखीत कागदपत्रांचे वाचन करताना मला अडचणी आल्या. यावेळी साधे सोपे मोडी साहित्य वाचनासाठी असावे असे मला वाटत होते.
कोल्हापूरमधील जेष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार संपादित ‘राजर्षी शाहु गौरव ग्रंथ’ मराठी बरोबरच चौदा भारतीय भाषांमध्ये तसेच जर्मन, इंग्रजी आदी विदेशी भाषांमध्येही प्रसीद्ध झाला आहे. रशीयन, जपानी, फ्रेंच, चिनी या भाषांमध्येही अनुवादाचे काम सूरू आहे. याचवेळी डॉ. जयसिंगराव पवारांचे सदरचे शाहु चरित्र माझ्या वाचनात आले. ‘मोडीलीपी शिका सरावातुन’ या माझ्या पुस्तकाच्या निमीत्ताने डॉ.जयसिंगराव पवार यांना भेटण्याचा योग आला, त्यावेळी मी त्यांना शाहु चरित्रतील काही पाने मोडी लिपीत संगणकीय टंकन केलेली दाखविली, व शाहु चरीत्राचे मोडी लिप्यंतर करण्याची इच्छा व्यक्त केली. पवार सरांनी आनंदाने परवानगी दिली. आज संगणकीय टंकन माध्यमातुन जशेच्या तसे पुस्तक लिप्यंतर करून वाचकासमोर ठेवणे हा अशक्यप्राय प्रवास इतिहास तसेच मोडीची गोडी यामुळेच शक्य झाले आहे.
– नवीनकुमार माळी
दि. ४ जानेवारी २०१७ -
रेनके कमिशन रिपोर्ट (अनुवाद)- अजित देशमुख
या अहवालातून…
एक ऐतिहासिक पुरावा सांगतो की इंग्रजांविरूद्ध झालेल्या सन १८५७ च्या बंडखोरीमध्ये भारताच्या उत्तरेकडील असंख्य समुदायांचा सहभाग होतं. बंडखोर राजपुत्र, सरदार आणि राजांनी एकतर इंग्रजांशी थेट लढाई करण्यासाठी या समुदायांचा वापर केला, किंवा बंडखोरांच्या सैन्याला अप्रत्यक्षपणे मदत करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी या समुदायांचा वापर केला. याचा परिणाम म्हणून, या समुदायांची १८५७ दरम्यान क्रूरपणे दडपशाही केली गेली आणि नंतर ‘गुन्हेगारी जमाती कायदा, १८७१’ अंतर्गत या समुदायांना ‘गुन्हेगार जमाती’ म्हणून घोषित करण्यात आले.
सन १८५७ च्या भारतीय स्वातंत्र्य युद्धाने ब्रिटीशांना खात्री पटवून दिली की बंडखोरांमधून विश्वासू लोक निवडून काढण्याची, निष्ठावंत आणि कपटींमध्ये फरक करण्याची वेळ आली आहे. १८५७ मध्ये बंडखोर व बंडखोरांची बाजू घेऊन लढलेल्या बर्याच समुदायांना १८७१ मध्ये ‘गुन्हेगारी जमाती’ म्हणून घोषित करण्यात आले. त्याचप्रमाणे ज्या समुदायांनी एकेकाळी प्रत्यक्ष राणा प्रतापला मदत केली होती आणि ज्यांनी १८५७ च्या बंडात इंग्रजांशी लढा दिला, त्यांना देखील गुन्हेगार जमात म्हणून घोषित करण्यात आले. या व्यतिरिक्त मद्रास मधील समुदायांचा आणखी एक गट गुन्हेगारीच्या इंग्रजी जाळ्यात अडकला. या समुदायाचे प्रभुत्व असलेल्या क्षेत्राला आपल्या राज्याशी जोडून घेण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. त्याला विरोध करण्यासाठी आंदोलने करणाऱ्या समुदायांच्या कपाळावर ते गुन्हेगार जमात असल्याचा शिक्का इंग्रजांनी मारला.
बर्याच भटक्या जमातींना ‘गुन्हेगार जमाती’ असे घोषित केले गेले आणि त्यांना या गुन्हेगार वस्त्यांमध्ये ठेवले गेले. त्या ठिकाणी त्यांना इंग्रजांच्या मालकीचे उद्योग, शेतमळे, गिरण्या, खाणी आणि कारखान्यांमध्ये फुकट काम करण्यास भाग पाडले गेले. हा उपाय त्यांच्या सुधारणेसाठी होता. या संभाव्य गुन्हेगारांवर ख्रिश्चन मिशनरी संस्थांद्वारे पाळत ठेवली गेली. यापैकी एक संस्था, साल्व्हेशन आर्मी, ही ब्रिटीश सरकार दरबारी मध्ये अत्यंत प्रभावशाली होती. साल्व्हेशन आर्मी या वस्त्यांना ‘गुन्हेगारांना बरे’ करण्याचा प्रयोग मानत असे.
ज्या समुदायांना ‘गुन्हेगारी जमाती’ म्हणून अधिसूचित केले गेले, त्यांनी त्यांचे रोजीरोटीचे पारंपारिक साधन आधीच गमावले होते आणि आता गुन्हेगारी कलंकाचा त्यांना जीवनभर त्रास सहन करावा लागत होता. त्यांना ‘गुन्हेगारी जमाती’ म्हणून घोषित केल्यामुळे, लोकांच्या मनात त्यांच्याबाबत भीती व अविश्वास होता. त्यामुळे काम शोधण्याच्या दृष्टीने परिस्थिती आणखीच बिकट झाली. इंग्रज प्रशासनाने देखील हे कबूल केले आहे की ज्यांना ‘गुन्हेगार जमाती कायद्या’ अंतर्गत नोंदविण्यात आले होते, ते लोक अधिकारपदावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या दयेवर अवलंबून होते.
-
ललित
या छोट्याशा पुस्तकात माझी मागची दहा वर्षं सामावली आहेत, असं म्हटलं तर काही वावगं नाही ठरणार. या पुस्तकातले लेख २००६ पासून ते २०१६ पर्यंतचे आहेत. प्रत्येक लेख कुठल्याशा अनुभवाचं प्रतिबिंब आहे. प्रत्येक लेखातला ‘मी’, मी स्वत: असेनच असं नाही, पण त्यात माझं मन गुंतलंय एवढं नक्की. हे सारे अनुभव खरेच असतील याची मी खात्री देऊ शकत नाही, इच्छित नाही. त्यातले काही कल्पनांचे तुकडे असतील, तर काही अगदी खरोखर घडलेल्या- बिघडलेल्या गोष्टींच्या तांत्रिक नोंदी असतील.
पंजक कोपर्डे
-
लाटांवरच्या कविता
प्रेम … फक्त अडीच अक्षरं!! जिथे प्रेम असेल तिथे आपुलकी, जिव्हाळा, काळजी देखील असणारंच. पण हे नसेल तर… असेल फक्त जीवघेणा दुरावा, विरह आणि मनाची ओढाताण!
मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात, माझ्याही मनात झाले. मनसोक्त प्रेम केलं आणि तेवढंच केलं आणि जे माझ्या ओंजळीत पडलं ते तुमच्यासमोर घेऊन येत आहे. दुःख विकत नाही, तुमच्या सर्वांमध्ये स्वतःला शोधत आहे.
वेळ निघून जाते, परिस्थिती बदलते, काळाच्या ओघांबरोबर माणसंही बदलतात आणि भावनाही. राहतात त्या आठवणी! केलेल्या मैत्रीच्या, त्यानंतर झालेल्या प्रेमाच्या आणि मग प्रेम न मिळाल्यामुळे झालेल्या निराशेच्या, विरक्तीच्या आणि विरहाच्या! त्या आठवणी कटूच असतात पण तरीही मनाला त्याच भिडतात, त्याच हव्याहव्याश्या वाटतात, त्याच धीर देतात अन जगायला शिकवतात! या आठवणीच आपल्या प्रेमाचा गुणाकार करतात अन प्रत्येक क्षणाला ते प्रेम वाढवत असतात.
पाणावलेले डोळे अश्रूंनाही वाट मोकळी करून देतात. व्यक्त झालेल्या शब्दांवर ओघळून त्या शब्दांनाही मोठेपण देतात. आज त्याच शब्दांना तुमच्या समोर घेऊन येत आहे.
हि फक्त सुरुवात आहे… कारण प्रेम, विरह, दुरावा आणि हृदयातल्या त्या प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्या सर्वांचा वेळ, तुमचं प्रेम हवं आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. सुरुवातीला चारोळ्यांचं हे पुस्तक तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत आहे. हे पुस्तक मी माझ्या सहचारिणीला, माझ्या प्रेमाला, माझ्या पत्नीला अर्पण करतो कारण तिच्याचमुळे विरहाचे क्षण विसरून आजही प्रेम माझ्या मनात, हृदयात जिवंत आहे अन याची जाणिव मला प्रत्येक क्षणाला होत असते.
संजय रोकडे
-
लेखणी सरेंडर होतीय – कीर्ती पाटसकर
Sale!₹150.00₹120.00प्रेम, विरह, प्रतारणा इत्यादी नाजूक भावनांखेरीज ही कवयित्री आणखी काही वेगळ्या अनुभवांनाही शब्दांकित करते. हे ‘शहर कपालभाती करतंय’, ‘सिटी वयात येते आहे’ असे तिला वाटते. ‘निसर्गाच्या फिटनेस’चाही ती विचार करते. अध्यात्माचे जुने अर्थ नव्या संदर्भात जाणून घेण्यास ती उत्सुक आहे. एक तीळ सात भावांनी वाटून खाल्ल्याच्या गोष्टीचे संस्कार तिला स्वार्थी होऊ देत नाहीत. जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाहीने बाळपावलांत बेड्या ठोकल्यामुळे दडपशाहीपुढे तिची लेखणी सरेंडर होत असली, तरी आपत्कालीन अग्निशामक सुविधेची सोय ती करून ठेवते. स्वतःच्या अस्तित्वाचा चेहरा शोधणाऱ्या नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ह्या कवयित्रीच्या मनगटामध्ये आत्मविश्वासाच्या विटांचा ढासळलेला बुरूज पुन्हा उभा करण्याची ताकत आहे.
कीर्ती पाटसकर ह्यांचा ‘लेखणी सरेंडर होतीय’ हा ६९ कवितांचा संग्रह आशय, विषय, मांडणी आणि शैली अशा अनेक दृष्टीनी महत्त्वाचा ठरेल असा आहे. त्यांची कविता आक्रमक नाही तरी शब्दांना धार आहे. त्यामुळे कविता नेमका वार करणारी आहे. साध्या आशयातही वेगळा आणि आशादायी विचार करणारी ही कवयित्री आहे.
– डॉ. अनुपमा निरंजन उजगरे -
वर्तुळ: लपवलेल्या कथांचा संग्रह – अंजली जोगळेकर
Sale!₹200.00₹150.00‘वर्तुळ’ हा माझा पहिला कथासंग्रह. हा प्रकाशित होतानाचा आनंद, खरं तर अत्यानंद, मी शब्दांत मांडू शकणार नाही, कारण तो अवर्णनीय आहे. आपल्या पहिल्या वहिल्या यशाचं आपल्याला खूप अप्रूप असतं, तसं ते मलाही आहे.
मी लिहू शकेन असं कधी मला वाटलंच नव्हतं. शाळेत असताना मला निबंध लिहायला खूप आवडायचं. पुढे महाविद्यालयात असताना वाचायची प्रचंड आवड असल्याने अनेक चांगल्या लेखकांची पुस्तकं मी वाचत गेले. वाचून झालं की त्यावर विचार करायची मला सवय लागली. हे सगळं मनात कुठेतरी झिरपत गेलं असं मला वाटतं. आत्ता पाच वर्षांपूर्वी नवरात्रात सहज म्हणून लिहायला लागले. माझ्या आईबद्दल लिहिलेल्या माझ्या पहिल्या लेखाला इतका भरभरुन प्रतिसाद मिळाला की त्यामुळे स्फूर्ती मिळून मी त्यानंतर सतत लिहीत गेले. ललित लेख, कविता आणि त्यानंतर कथा अशा क्रमाने लिखाण चालूच राहिले. वेगवेगळ्या विषयांवर लिहीत असतानाच माझ्या एका मैत्रिणीने (विनीता देशपांडे) मला कथा लिहून पाहायला सुचवलं. पहिली कथा (नशीब) मी लिहीली तेव्हा ती झरकन कागदावर उतरली. मला फार विचार करावा लागला नाही. त्यानंतरच्या कथाही अशाच सुचत गेल्या, मी लिहीत गेले. कथेचं बीज आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या समाजातच असतं. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी एक कथा असते असं मला नेहमी वाटतं. म्हणूनच कथा वाचताना यातील व्यक्तिरेखा आपल्या जवळपासच वावरताहेत असं तुम्हाला वाटू शकतं. कथेच्या माध्यमातून मी हळूहळू व्यक्त होत गेले. एखादी कथा लिहून झाली की मला समाधान मिळू लागलं, शांत वाटायला लागलं.
हळूहळू जेव्हा अनेक कथा लिहून झाल्या तेव्हा या कथांचे पुस्तक करण्याचा आमचा विचार सुरू असतानाच Bronato Publication च्या शैलेश खडतरे यांच्याशी संपर्क झाला. माझ्यासारख्या नवलेखिकेला पहिल्याच संवादात त्यांनी खूप चांगला व सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांचे आभार कोणत्या शब्दात मानावेत ते समजत नाही. त्यांच्या प्रतिसादामुळे माझ्यासारख्या अनेक लेखकांना नक्कीच स्फूर्ती मिळेल. त्यांना खूप खूप आणि मनापासून धन्यवाद. जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचावं हाच उद्देश या कथासंग्रहामागे आहे. यातून मिळालेले पैसे LEAF (LIFE EMPOWERMENT & AWARENESS FOUNDATION ) या महिला व मुलांसाठी काम करणाऱ्या NGO ला देऊन समाजकार्याला हातभार लावण्याचा माझा निश्चय आहे. तुमच्या प्रतिक्रिया, सूचना वाचायला मला नक्की आवडेल. तुमच्या सूचना पुढील लेखनासाठी खूप उपयुक्त ठरतील. तुम्ही तुमचा प्रतिसाद नक्की पाठवाल याचा विश्वास वाटतो.
लिहिताना वेळेचं भान कधीच राहात नाही. मला सांभाळून घेणारे आणि मला लिहितं ठेवणारे माझे कुटुंब, माझा नवरा विश्राम, माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या माझ्या मुली मिताली व शुभांगी, सचिन, कुशल ही माझी मुले, माझ्या लेखनात सुधारणा सांगणाऱ्या माझ्या मैत्रिणी मंजुषा देशपांडे, शुभदा दामले, बहीण जयंती नेने याशिवाय सतत प्रोत्साहित करणाऱ्या ‘प्रतिबिंब’ मधील माझ्या सख्या यांचे कितीही आभार मानले तरी ते कमीच पडतील.
माझी जाऊ आणि प्रसिद्ध लेखिका मोहना जोगळेकर हिनेही वेळोवेळी केलेल्या सूचना, सुधारणा आणि प्रोत्साहन यामुळे हे पुस्तक साकार होतंय. पण ती माझी मैत्रीण जास्त असल्याने तिच्या ऋणात राहणं मला आवडेल.
Showing 71–80 of 93 results