Posted on

नागराज मंजुळे यांच्या ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ सांगत आहेत – जयेश मेस्त्री

2+

अनेकांनी नागराज मंजुळेंचा फॅंड्री पाहिलेला आहे. फॅंड्रीमुळेच मंजुळे महाराष्ट्राला परिचित झाले. फॅंड्रीच्या यशानंतर त्यांचा सैराट प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण सैराट हा फॅंड्रीपेक्षा खुप वेगळा होता. सैराटबद्दल अनेकांचे मिश्रीत मत होते. पण या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड्स मोडून काढले आणि मराठी चित्रपट करोडो रुपयांचा धंदा करु शकतो, यावर शिक्कामोर्तब झाले. रसिक बर्‍याचदा कलाकाराच्या कलाकृतीच्या माध्यमातून कलाकाराचे मन वाचण्याचा प्रयत्न करतात. सैराट आणि फॅंड्री हे दोन विरुद्धार्थी चित्रपट पाहिल्यावर आपल्याला मंजुळेंचं मन काही कळत नाही. तरी दोन्ही चित्रपट हे समाजातील उच्च आणि खालच्या स्तारातील लोकांमधील संघर्षाबद्दल आहेत. पण जसा उच्च समाजाला आपल्या उच्चपणाबद्दल अभिमान किंवा अहंकार बळावू लागतो.

तसाच खालच्या समाजाला आपण उच्च नसल्याबद्दल कमकूवतपणा आणि न्यूनगंड वाटू लागतो. या दोन्ही गोष्टी इतक्या प्रचंड प्रमाणात बळावू लागतात की दोघांमधील दरी विकोपाला पोहोचते. मुळात उच्च कोण आणि खालचे कोण? हा समज सर्वच समाजात आहे. जसे एखाद्या कंपनीत मालक उच्च असतो आणि शिपाई खालच्या दर्जाचा असतो. ही भावना दोघांच्याही मनात असते. ही भावना विकोपाला गेली की त्यातून अहंकार आणि न्यूनगंड जन्माला येता. मग हा अहंकार आणि न्यूनगंड वर्षानुवर्षे पोसले जातात आणि त्यातूनच पुढे उभे राहते ते बंड. म्हणून आपल्याला कुठेतरी वाटून राहतं की कवी मनाचा हा दिग्दर्शक एका विशिष्ट हेतूने कलाक्षेत्रात उतरला आहे. अर्थात हे चूकीचंही असू शकतं. पण नागराज मंजुळेंनी लिहिलेला कविता संग्रह मी वाचला आणि मला असं वाटू लागलं की हे कदाचित सत्य असावं.

आपण जे भोगतो, जे सहन करतो त्याचे व्रण घेऊन आपण आयुष्यभर जगत असतो. आपण कितीही मोठे झालो तरी आपला भूतकाळ सदैव आपल्या सोबत राहतो. जर आपण कलाकार असू तर आपल्यावर आणि आपल्या भिवतालच्या समाजावर घडलेल्या आघातांचे वर्णन आपण करतोच. मग कुणी म्हणतं की आपण योग्य आहोत आणि कुणी म्हणतं आपण अयोग्य आहोत. पण कलाकार योग्य-अयोग्यासाठी लिहित नाही. कलाकार केवळ समाजाचा आरसा होतो. स्तुती आणि टीका या पल्ल्याड कलाकाराचे वास्तव्य असते. तिथपर्यंत पोहोचण्याचा रसिकांनी प्रयत्न केला पाहिजे. मग आपण कलाकृतीला लेबल लावणे बंद करु. मला दलित साहित्य, मुस्लिम साहित्य हे असले प्रकार कधीच पटले नाही. साहित्य हे साहित्य असते. हार फार तर आपल्याला साहित्याचे विभाजन भाषेच्या आधारावर करता येईल. मराठी साहित्य हिंदी साहित्य इ. असो. आपण मूळ विषयाकडे य़ेऊया.

उन्हाच्या कटाविरुद्ध हा काव्य संग्रह आपण मुखपृष्ठापासूनच वाचण्यास प्रारंभ करतो. मुखपृष्ठावर नागराज मंजुळेंचा धीरगंभीर फोटो आहे. तो फोटो वाचून झाल्यावर आपण आतमध्ये डोकावतो आणि पहिलीच कविता आपण वाचतो;

माझ्या हाती
नसती लेखणी
तर…
तर असती छिन्नी
सतार… बासरी
अथवा कुंचला
मी कशानेही
उपसत राहिलो असतो
हा अतोनात कोलाहल मनातला.

इथूनच कवीचं मन उलगडायला सुरुवात होते. कवी किंवा लेखक जेव्हा लिहितो. म्हणजे तो काय करतो? तर तो मोकळा होतो. त्याच्या आत जे साठलंय, त्यास वाट करुन देण्याचा आदर्श मार्ग म्हणजे लेखणी. कवीच्या मनाच्या आत प्रचंड कोलाहल माजलाय. पण हा कोलाहल समाजाने लादलेला आहे. कवीच्या भोवताली घडणार्‍या घटनेने कवी अस्वस्थ आहे आणि या घटनांचा आणि घटकांचा समाचार घेण्याचा, या विरुद्ध बंड पुकारण्याचा, विद्रोह करण्याचा त्याला केव्हाच एक मार्ग सापडलाय, तो मार्ग म्हणजेच लेखणी, कलाकृती. तुझ्या येण्याअगोदर एक पत्र या कवितेत कवी लिहितात,

माझय दहा बाय दहाच्या घरात येशील तेव्हा
माझ्या भाबड्या आईचं गबाळं स्वागत
बनियान टॉवेलातला मी
आमची कण्हतधुपत पेटणारी चूल
काळाकुळकूळीत चहा
आमचं ऑल इन वन घर
…हे सारं तुला किळसवाणं वाटल्याची खूण
तुझ्या डोळ्यांत पाहून
मी स्वतःची घृणा करण्यास विवश होईन.

मुंबई सारख्या शहरात राहिल्यामुळे आणि दहा बाय दहाच्या घरात राहत असल्यामुळे मी या कवितेतल्या भावना समजू शकतो. प्रेम ही एक दिव्य भावना आहे आणि गरीबी एक विदृप वास्तव. प्रेम आणि गरीबी एका ठिकाणी सहसा नांदत नाही. म्हणूनच कवी पुढे म्हणतो की,

ती रंगवलेली स्वप्नं इथल्या भूमीत
अंकुरणार नाही
आणि मला बोन्साय होणं मान्य नाही.
तू तुझी स्वप्नबीजं घेऊन जा
एक नवी सुपीक जमीन शोध
माझ्या या वांझोट्या भूमीला
कधीतरी दिवस जातीलच…

कोमेजलेल्या प्रेमफुलाचं दुःख साजरं करताना कवीला फुलण्याची सुद्धा आशा आहे आणि हिच आशा माणसाला जीवंत ठेवते. हेही दिवस जातील. आपलेही दिवस येतील या एका आशेवर माणूस श्वास घेत असतो. अ आणि ब या कवितेत प्रतिकात्मकतेने कवी खूप काही सांगून जातात. एक भयाण वास्तव कथून जातात,

अ.

जाहिरातीसाठी
द्यायला
हरवलेल्या माणसांचाच
घरात नसतो
एकही फोटो.

ब.

ज्यांचा
घरात
एकही नीटसा फोटो नसतो
अशीच माणसं
नेहमी हरवतात.

आपण किती मोठमोठ्या गोष्टी करत असतो. मुंबईचं शांभाय, भारत महासत्ता वगैरे वगैरे. पण आपण कधी मातीत नागड्या पायाने व उघड्या डोळ्याने चालून का नाही पाहत? का सत्य समोर आल्यावर आपण सगळेच गांधारी बनून जातो? किती किती प्रश्न शिल्लक आहेत आपल्या देशात, या जगात. पण आपण सारे त्या प्रश्नांची उत्तरे न शोधता त्यांना तुडवत पुढे जातोय.

नागराज मंजुळे त्यांच्या वास्तववादी सिनेमासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कविताही तशाच आहेत. वास्तववादी… पण माझ्यासाठी ते वास्तववादी असलंच पाहिजे असं नव्हे. कारण मी (मी म्हणजे सर्व वाचक) वेगळा आहे, माझे दुःख वेगळे आहेत. ज्यांच्यावर मला आसूड ओढायचंय ते वेगळे आहेत. पण यातील भावना त्याच आहेत. जनगणनेसाठी या कवितेत ते लिहितात,

जनगणनेसाठी

स्त्री-पुरुष असा
वर्गवारीचा कागद घेऊन
आम्ही गावभर
आणि गावात एका
अनवट वळणावर
भेटलं चार हिजड्यांचं
एक घर

हे सत्य असलं तरी आता ही परिस्थीती हळू हळू बदलतेय. या आधुनिक युगात या पंथालाही स्थान मिळत आहे. असो.

विद्रोही कवी कसे तयार होता? मुलात मी सुरेश भट आणि नारायण सुर्वे वाचल्यामुळे मला विदोही कवींच्या वेदना ठाऊक आहेत. तशाच वेदना मंजुळे व्यक्त करताना लिहितात,

एकसारख्या प्रकृतीचे
आम्ही दोघे मित्र
एकमेकांचे जिवलग
एकच ध्येय
एकच स्वप्न घेऊन
जगणारे.
पुढे त्याने आत्महत्या केली
आणि मी कविता लिहिली.

विद्रोही कविता अशाप्रकारे जन्माला येतात. आपल्याला वाटत राहतं की हे संस्कृतीवरचे आक्रमण आहे. ते असतेच मुळी. पण एखाद्यासाठी असलेली संस्कृती दुसर्‍याच्या दुःखाचे कारण बनता कामा नये. पण आजकाल तुम्ही हिंदू संस्कृतीच्या हिरोधात लिहिलं की तुम्हाला विद्रोही किंवा बंडखोर अशी पदवी मिळते. पण हिंदू संस्कृतीनेही बरेच काही सोसले आहे आणि मी त्या संस्कृतीचा पाईक आहे. म्हणूनच मी गानराज मंजुळेंची स्तुती करु शकतो. त्यांच्यासाठी माझे प्राणाहून प्रिय शब्द खर्च करु शकतो. ज्या संस्कृतीच्या विरोधात मंजुळे बंड पुकारतात त्याच संस्कृतीने हे संस्कार माझ्यावर केले आहेत. मला हे लिहिण्याचा अधिकार प्राप्त होतो कारण ज्या संस्कृतीने त्यांना शूद्र ठरवले त्याच संस्कृतीने मलाही शूद्र ठरवले. ते उन्हाच्या कटाविरुद्ध या कवितेत लिहितात,

ह्या सनातन बाहेरख्याली उन्हाला घाबरुन
तू का होते आहेस
एका सुरक्षित खिडकीतील भोभिवंत बोन्साय
अन लाचारपणे मागतेयस सावली.
पुढे यच कवितेत ते लिहितात,
का तू उन्हाच्या कटाविरुद्ध
गुलमोहरासारखं
त्वेषानं फुलत नाहीस.

ज्या सनातन संस्कृतीने मला प्रेम दिले, आधार दिला. त्याच सनातन संस्कृतीने मंजुळेंच्या मनाला मात्र वेदना दिल्या. हे असं का झालं? सारवरकर म्हणाले होते हिंदूंमधील शेवटची जात कोणती हेच कळत नाही. प्रत्येक जातीला आपण कोणातरी जातीपेक्षा उच्च आहोत असे वाटत असते. हे सावरकरांचे विधान किती तंतोतंत खरे आहे. ते म्हणायचे, उच्च वर्णीयांप्रमाणे तुमचाही हिंदू धर्मावर तितकाच अधिकार आहे. असो.

मी असा अश्रद्ध या कवितेतील या ओळी मला अधिक भावल्या,
अजूनही पूजाप्रार्थना वगैरे
करीत असशील तर…
तू त्याच्याकडे
आणखी एका जन्माचा हट्ट धर
मी मात्र मरेन
फक्त विश्वास ठेवून तुझ्यावर.

श्रद्धा अशीच तर जन्माला येत असते. श्रद्धा प्रेमातूनच जन्माला येते. मग कदाचित प्रेमाची जागा भयाने व्यापत असेल. अश्रद्ध माणूस मुळात खरा श्रद्धाळू असतो. कारण या जगात श्रद्धा नाही यावर त्याची श्रद्धा असते. ती श्रद्धा श्रद्धाळू माणसापेक्षाही खरी असते.

या पुस्तकातील सर्वच कविता वाचनीय आहेत. पुस्तक लहान आहे म्हणून एका बैठकीत वाचून पूर्ण होते. यातल्या कविता इतक्या वास्तववादी आहेत की आपल्याला काल्पनिक चंद्र सुर्य तार्‍यांच्या दुनियेत रममाण करण्यास बंदीच आहेत. मी कुणी मोठा जाणंकार नाही नाही. परंतु नागराज यांनी चित्रपट क्षेत्रासोबत साहित्य क्षेत्रातही योगदान दिले पाहिजे असे मला वाटते. कारण त्यांचा विद्रोह का कुणास ठाऊक कवितेतून अनुभवासा वाटतो.

कवितेच्या पुस्तकाबद्दल एक बरे असते. कोणतेही पान उघडून वाचता येते. मात्र आयुषयचं तसं नसतं. आयुष्याची पानं तो विश्वेवर म्हणा किंवा प्राक्तन म्हणा किंवा तुम्ही नास्तिक असाल तर एकवेळ त्यास काही नाव देऊ नका. पण आयुष्याची पाने आपण पलटवत नाही हेच खरे. कुणीतरी एक अद्रूश्य हात असतो. कोण? कुठचा? ठाऊक नाही. पण आहे मात्र… कदाचित तोच रचत असेल उन्हाचा कट आणि मग त्याच्याच इच्छेने असे असंख्य नागराज मंजुळे या कटाविरुद्ध पेटून ऊठत असतील. हे जर खरं असेल तर असे कट त्याने जरुर रचावे आणि निर्माण करावे शेकडो नागराज मंजुळे… आम्ही रसिक वाचक त्या उन्हाच्या कटाचे ऋणीच राहू…

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

मूळ लेख वाचण्यासाठी- http://www.jayeshmestry.in/unhachya-kataviruddha-nagaraj-manjule/

 

2+
Posted on

जगण्याची दृष्टी: अल्बर्ट एलिस

1+

दुःखांचे डोंगर कोसळलेले असताना,विचारांच काहूर माजलेलं असताना आपण गुरफटत जातो अविवेकीपणाच अस्तर लेवून त्यावेळी कोणच नसत आपल्याला सावरायला.काही पुस्तक आपलं ओझं हलकं करण्यासाठी बनलेली असतात कारण त्यांनीही झेललेली असतात तितकीच दुःखाची,त्यागाची आवर्तन जी जीवनाने वेळोवेळी आपल्याला बहाल केलेली असतात. फक्त या पुस्तकांना आपण स्पर्श करून पावन झालेलो नसतो म्हणून जगणं कधीच कळलेलं नसत आपल्याला आणि दृष्टीही मिळालेली नसते. एकदा की अशा दोस्ताशी यारी झाली की मग तो रिता होत जातो आपल्या मनात,मग त्याच्यात आणि आपल्यात काहीच अंतर उरत नाही.तो बोलत जातो आपली बोली आणि आपण गात राहतो त्याच गाणं. किती सुरेख ना!

अल्बर्ट एलिस सांगत राहतो जगाचं तत्वज्ञान त्याच्या पुस्तकांच्या पानात पसरलेलं,त्यात कधी आपलं बालपण डोकावत,तर तरुणपणाच्या उंबरठ्यावर केलेल्या गमतीजमती, प्रेमाचा श्वास रोखून धरायला लावणारी अधीरता, तर कधी कधी तुटत राहणार मन आणि त्याला तितक्याच प्रखरतेने जोडणारा शोधून सापडलेला मनाचा धागा. आयुष्य म्हणजे काय असतं, कस जगायचं असत हे पुस्तक तर सांगून जातच, पण एक तिसरा डोळा देऊन जात जे आपल्याला बघायला लावत क्षितीजाच्या पार व मानवी भावनांच्या जन्माच्या आणि मृत्यूच्यापार.

मला आज जाणवतंय की तो खुपच उशिरा आला माझ्या आयुष्यात, जरा लवकर आला असता तर जी जगण्याची चार पान आतापर्यंत रंगविली नव्हती,ती वेगळ्याच रंगानी रंगविता आली असती.विवेकनिष्ट उपचार गाठीला मारून मी माझ्या दुःखांच्या आणि संकटांच्या डोळ्यात पाहिल्यावर आता मला काही वेळासाठी अस्वस्थता जाणवते पण पुढच्याच क्षणी मनात दबा धरून बसलेला अल्बर्ट मला नवा रस्ता दाखवतो तेव्हा माझ्या भावनांवर विजय मिळवायला मी शिकलेलो असतो.तुम्हीही करू शकता अस काही, वाचून बघा अल्बर्ट एलिस आणि घ्या मोकळा श्वास जो आजपर्यंत कोंडलाच होता नुसता.ज्यांनी कोणी अल्बर्ट एलिसीची पुस्तकं वाचली असतील त्यांनी आपले अनुभव विशद करावेत.मी अंजली जोशींचे विशेष आभार मानतो की त्यांनी असा लाखमोलाचा माणूस मराठीत आणला.नक्की वाचा.

© डॉ.कृष्णा सुभाष सपाटे

1+
Posted on

भरतमुनींचे नाट्यशास्त्र- डाॅ.पराग घोंगे

0

नाट्यशास्त्र हा भरतमुनी प्रणित प्रबंधात्मक ग्रंथ भारतीय नाट्यकलेचा आधारभूत ग्रंथ मानला जातो. जवळ जवळ दोन हजार वर्षांपूर्वी हा ग्रंथ लिहिल्या गेला पण अभ्यासकांसाठी आजही ‘नाट्यशास्त्र’ संदर्भहीन झालेले नाही. ह्या महान ग्रंथाचे संदर्भमूल्य कालातीत आहे.
विजय प्रकाशन ने हा ग्रंथ आता मराठीत प्रकाशित केलेला आहे

आपल्या नजिकच्या पुस्तक विक्रेत्याकडे

भरतमुनींचे नाट्यशास्त्र
डाॅ.पराग घोंगे
पृष्ठसंख्या ३००
किंमत ४००₹

या पुस्तकाची मागणी करा

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा

http://www.vijayprakashan.com/product/भरतमुनींचे-नाट्यशास्त्र/

0
Posted on

मुखपृष्ठा विषयी…या अक्षरपेरणीच्या सदरातून

0

ज्याला तोलता येतं त्याला पेलताही येतं !

सुशिलचा आणि माझा परिचय महेश अचिंनतलवार मुळे झाला.महेश कवितेवर आणि कवीवर प्रेम करणारा मधाळ मित्र आहे.कितीतरी कवींच्या कविता त्याच्या तोंडपाठ आहेत. आणि सादरीकरण तर,क्या बात है ! सुशिलचं पुस्तक ग्रंथाली करतंय आणि मुखपृष्ठ तुला करायचंय असं त्यांनं सांगितलं.मग सुशिलने कविता पाठवल्या मेल वर.फोन ही केला. “दादा तुमची चित्र मी पाहिली आहेत.तुम्हीच मुखपृष्ठ करावं असा माझ्यासह सर्व मित्रांचा आग्रह आहे. तोवर मी सुशिलच्या कविता वाचल्या नव्हत्या.सुशिलच्या आवाजावरून,बोलण्यावरून मी त्याच्या कविता कशा असतील असा मनातल्या मनात अंदाज बांधत होतो. किती साधा सुधा,भोळा,निरागस वाटला.पण कल्पनेत त्याचा चेहराही सापडेना आणि त्याच्या कवितेचाही ठाव लागेना. निरागसता अथांग असते तिचा ठाव घ्यायला लागलं की ती अधिकच भाव खायला लागते,कारण निरागसतेला तळ असतो पण तळवा नसतो.

मेल वर कविता आल्या.’शहर आत्महत्या करायचं म्हणतंय..!’ शीर्षक वाचुन थबकलो. पॉश दूकान महागडं असेल म्हणून आपण थबकतो तसे.हळुच पान उलटलं आणि ‘”उजेड पेरणाऱ्या मशाली अद्याप कुणाच्या गुलाम नाहीत.” या अर्पणपत्रिकेतल्या ओळीनी जाम भुरळ घातली. चित्र तर इथेच होतं. पण पुढे वाचायची उत्सुकता वाढली.सरलाट वाचुन काढलं.वरवर पॉश असणारी शहरं आत किती बकाल आहेत याचं त्रिकाल दर्शन सुशिलची कविता वाचताना घडत होतं. हे शहर मला तळहातावरल्या फोडासारखं वाटलं.वरवर पातळ,तकलादू पापुद्र्यासारखी माया आणि आत खच्चून भरलेली भयाण किळसवाणी क्रूरता.जिव मुठीत घेवुन इथलं जगणं.पण हे शहरच इथल्या माणसांचा जिव आहे. लाखो हातांनी या शहराचा खोपा विणलाय.चिवचिवाट आहे,गोंगाट आहे पण मनात जिवघेण्या दहशतीचं मौनी सावट. जळुन ख़ाक होवो अथवा राख उमेदीनं उभं राहायचं बळही शहराच्या मनगटात आहे.’ही पृथ्वी शेषनागाच्या फणावर नाही तर श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे’, असे आन्नाभाऊ साठे उगीच म्हणत नाहित. कविता वाचताना चित्र स्पष्ट होत होतं. कापणाराचे हात,राबणाराचे हात,वसवणाराचे हात,फसवणाराचे हात,हे सारेच हातोहात आहे.या हाताचं एक बोट आहे हे शहर . इथल्या माणसाच्या जगण्याचं बेट आहे हे शहर. ज्याला तोलता येतं त्यालाच पेलताही येतं.शहरी जाणिवेचा अवकाश पेलुन धरणाऱ्या सुशिलकुमार शिंदे या मित्राच्या संग्रहाला शहर पेलुन धरणारा मनगटी हात मला काढावासा वाटला. काळ्या,राखाडी रंगाच्या पार्श्वभूमीवर.फिनिक्स पक्षासारखा.

पुस्तक छापून आलं आणि कितीतरी फोन आले. चित्रार्थ सर्वाना गूढ़ वाटला. बरेच जण शहराच्या आत्महत्येचे संदर्भ चित्रात शोधत होते.मी म्हटलं ही शहरं रोज मनान मरतात पुन्हा जीती होतात. मनाचं मरणं ही देखिल आत्महत्याच नाही का ?
– विष्णू थोरे,चांदवड
9325197781

0
Posted on

‘कवितेतला वासुदेव – संतोष वाटपाडे’ रणजित पराडकर

0

‘सोशल मीडिया’ हे एक अतिशय प्रभावी माध्यम आहे आणि बदलत्या

काळाच्यासमीकरणात तर छापील माध्यमांपेक्षाही जास्त प्रभावी आहे. सोशल मीडियाचापरिणाम म्हणून मी लिहिता झालो आणि ह्याचाच परिणाम म्हणून ‘संतोषवाटपाडें’सारख्यांच्या संपर्कात येऊ शकलो व समृद्धही झालो.

रविबिंब सरकले खाली
अवनीवर संध्या आली
कुंकूम भाळावर छोटे
नववस्त्र तनावर ल्याली
रांगोळी पाण्यावरही
किरणांची अवचित झाली
क्षितिजावर लुकलुकणारी
फ़ुलवात कुणाची आहेही बाग कुणाची आहे ?

ह्या प्रश्नाचं उत्तर मला केशवसुतांच्या कवितेत सापडतं. ‘देवाचे दिधले असे जग तयेआम्हांस खेळावया!’

ही बाग कवीची आहे ! ह्या कवितेत कवी संतोष वाटपाडे प्रत्येक कडव्यात दिवसाचेविविध प्रहर रंगवत नेतात आणि सगळ्यात शेवटी –

दररोज तरी धरतीला
का ओढ तमाची आहे….ही बाग कुणाची आहे ?

– असा व्याकुळ करणारा प्रश्न करतात.

फार क्वचित असा अनुभव येतो की एखादी कविता वाचल्यावर प्रचंड अस्वस्थ वाटतं, गहिवरून आल्यासारखं वाटतं, दोन चार ठोके चुकल्यासारखं वाटतं.

पहाटेच्याही जरासं आधी अचानक जाग यावी. झोप पूर्ण झालेली असावी. घराबाहेरएकाच वेळी स्वच्छ चांदणं सांडलेलं असावं आणि पूर्वेकडे रंगांच्या पखरणीला अजूनसुरुवात झालेली नसली तरी तशी तयारी कुणी तरी करत असल्याची एकअव्यक्तापलिकडची चाहूल असावी. विविध फुलांचा एकत्र सुवास दरवळत असावाआणि सर्वदूर पसरलेली नीरव शांतता देवघरात मंदपणे तेवणाऱ्या समईच्या हसतमुखस्थितप्रज्ञतेसारखी भासावी. वेळ काही क्षण थांबली आहे, असंच वाटावं. बहुतेक तीथांबतही असावी.

Continue reading ‘कवितेतला वासुदेव – संतोष वाटपाडे’ रणजित पराडकर

0
Posted on

पुस्तक परिचय: ‘व्हर्जिन’- नितीन वाघ

1+

सेक्स, व्हर्जिनिटी, कोरी स्त्री आणि मी सह आपण सारे

नितिनची ही कादंबरी खरं तर तीन महिन्यांपूर्वी आणली होती. पण वेळ मिळत नव्हता. तरीही तिला सतत वाचण्यासाठी खुणावणार्या पुस्तकात ठेवलेलं. तर दुपारी पाहुणे गेल्यावर तिला सहज हातात घेऊन बसलो. म्हटलं न चाळता थेट वाचायलाच घेऊ. आणि आश्चर्य म्हणजे अवघ्या साडेतीन तासांत ही कादंबरी वाचून संपवली.

योगायोग असतात. सकाळी मी “ऐसे अक्षरे” मधली किरण नगरकरांची मुलाखत वाचीत होतो. ती वाचताना आपल्या व्यवस्थेचा दांभिकपणा त्यांच्या तोंडून वाचताना मला स्वतःला खूप अपराधी वाटत होतं. तेवढ्यात पाहुणे आल्याची बायकोने वर्दी दिल्यानं ती मुलाखत (दोन भागात आहे. ) अर्धीच राहिली. ती फेबुवर सापडेना म्हणून मी नितिनचा वाघ काय म्हणतोय बघूया म्हणून “व्हर्जिन ” हातात घेतली. वाघ आणि व्हर्जिन, मुखपृष्ठावरील स्त्री हे सगळे एकदम इतक॔ अंगावर आलं की बस्स !!!!

धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था. त्यातच हे वाचताना मला विजय तेंडुलकरांच्या कमलाची आणि शांततेच्या कोर्टाची आठवण झाली आणि भारतीय माणूस म्हणून मीच नितिनने उभ्या केलेल्या कटघर्यात उभा राहिलो. त्यातून सुटण्यासाठी मला साडेतीन तास लागले. पण तो काळ वाचक म्हणून फारच मोठा आहे. म्हणून हा सगळा प्रपंच. …

Continue reading पुस्तक परिचय: ‘व्हर्जिन’- नितीन वाघ

1+
Posted on

पुस्तक परिचय: हृषीकेश जोशी यांची ‘दुसरी बाजू’

0

ह्रषिकेश जोशी या लेखक व अभिनेता असलेल्या व्यक्तिमत्वाने लिहिलेले हे अप्रतिम पुस्तक आहे. जगण्यातील विसंगतीवर लेखकाने नेमकेपणाने भाष्य केले आहे. समाजातील विचारांना, घटनांना दुसरी बाजु असु शकते याचा विचारही आपण करत नाही. लेखकाने अनेक उदाहरणे देऊन ते स्पष्ट केले आहे. तर्कशुध्द, परखड, आणि नेमकी अशी पुस्तकाची भाषा आहे. काही प्रसंग लेखकाच्या पाहण्यात आलेले तर काही समाजात घडलेले. पण त्यावरचे भाष्य मात्र अचुक आहे. पुस्तकातील काही गोष्टींचा पुसटसा उल्लेख या माझ्या पोस्टमध्ये मी करतो, जेणेकरुन या पुस्तकाविषयी कुतुहल वाढुन ते वाचण्यास तुम्ही प्रवृत्त व्हाल.

१) निर्भया प्रकरण देशभर गाजले आणि समाजात त्याचे विविध पडसाद उमटले. त्या काळात लेखकाने एका हिंदी वाहिनीवरील लहान मुलांच्या शोच्या परीक्षकाचे काम केले होते. एका छोट्या मुलीने अभिनयासाठी जो प्रवेश सादर केला, त्याचा लेखकालाच धक्का बसला, काय होता तो प्रसंग?  Continue reading पुस्तक परिचय: हृषीकेश जोशी यांची ‘दुसरी बाजू’

0
Posted on

‘लिलियनची बखर’- पुस्तक परिचय

3+

‘लिलीयनची बखर’
लेखक: अनंत सामंत
प्रकाशक: मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

म्हणावं तर ऐतिहासिक किंवा सत्यकथा असणार हे पुस्तक, इतिहासाने किती नररत्न आपल्या उदरात सामावून घेतले आहेत याचा उत्कृष्ट नमुना आणि त्यापैकीच एक असणारा ‘राजा कृष्णाजी भट’ यांच्याबद्दल सांगणारे हे पुस्तक.
साधारणपणे कान्होजी आंग्रे यांच्यानंतर समुद्रावर दहशत निर्माण करणारा हा योद्धा. हा राजा तसा मराठेशाहीतीलाच, पण ना याची कोणती जहांगीर, ना कोणती वसाहत, ना कोणता राज्याभिषेक, ना कोणता बडेजाव. बाकी याचं स्वतःच अस असणार एकमेव जहाज ज्याच नाव ‘दुर्गा’ आणि त्याच्यावर त्याच स्वतःच अस फडकणार निशान ते म्हणजे पांढऱ्या झेंड्यावर स्वस्तिक. या झेंड्याची व गलबताची जरब इंग्रज, पोर्तुगीज तसेच सिद्द्यांना सुद्धा होती.
पुस्तकाची सुरवात ऐतिहासिक पुराव्याने होते. साधारणपणे जून १७२७ च्या आसपासच्या काळातील झालेल्या घडामोडी यात चितारण्यात आल्या आहेत. राजा कृष्णाजी भट, इंग्रजांचा चीफ एजंट सर गिफर्ड, गिफर्ड ची नात शोभावी अशी पण त्याची असणारी तिसरी बायको लिलीयन गिफर्ड व बऱ्याच जहाजांवर मर्दुमकी गाजवलेला कॅप्टन कॅम्पबेल यांच्याशी निगडित असणाऱ्या गोष्टी यात मांडण्यात आल्या आहेत.
लंडन मध्ये एका रिकाम्या वाड्यात काही हस्तलिखित सापडली. काही इतिहासकारांच्या मते त्यातील हस्ताक्षर हे लिलीयन गिफर्ड यांचे असावेत व त्या नोंदीवर आधारित हे पुस्तक असल्याने यास “लिलीयनची बखर” हे नाव देण्यात आलं असावं.
बंडखोर, अन्यायाची चीड असणारा कृष्णाजी भट हा तितकाच सुसंस्कृत व एखाद्या इंग्रजाला लाजवेल अशी इंग्रजी बोलतो. हा योद्धा अरबी समुद्रात होणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज व सिद्दी याच्या जहाजाच्या वाहतुकीवर दहशत ठेवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करून ती वेगवेगळ्या उपयोगी कारणा करिता खर्च करतो. अशाच एका ‘डेस्टिनी’ या इंग्रज जहाजाला पकडल्यावर त्याचा सापळा रचून डेस्टिनीला वाचवायला येणाऱ्या ‘क्रिस्टल’ ह्या सर गिफर्डच्या जहाजाला कावेबाज व शिताफीने शरण येण्यास भाग पाडून त्याबदल्यात पन्नास हजार पौंडची मागणी व त्याबदल्यात खुद्द सर गिफर्डची असणारी तिसरी बायको लिलीयन गिफर्ड हिस ओलीस ठेऊन घेणे हे एखाद्या हॉलिवूड चित्रपटासारखं लेखकाने या पुस्तकात मांडलंय. या सर्वातून सुटता यावं म्हणून सर गिफर्ड ने केलेला विश्वास घातकीपणा व कप्तान कॅम्पबेल चा धुर्तपणा सुद्धा यात उत्कृष्ट पणाने मांडलाय. लिलीयन ला ओलीस ठेवल्यावर तिचा असणारा कृष्णाजी भटा बद्दल चा तिरस्कार व पुढे जाऊन त्या तिरस्काराचे होणारे प्रेमात परिवर्तन त्यांनतर सुद्धा कृष्णाजी भटा ने इंग्रजांच्या हृदयात भरवलेली धडकी हे वाचण्याजोगे आहे .
हे पुस्तक वाचताना एखादा हॉलिवूडपट डोळ्यासमोर चालू आहे असं लिहल असून बऱ्याच वेळेला ‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन’ या चित्रपटाची आठवण होते.

– महादेव कुंभार

3+