Posted on

‘कुंकू ते दुनियादारी’ डाॅ.राजेंद्र थोरात

3+

चित्रपट हे माध्यम फक्त मनोरंजनात्मक न राहता ते प्रबोधन करताना दिसते. प्रगल्भ झालेला प्रेक्षक चित्रपटाकडे अभ्यासात्मक भूमिकेतून पाहत असतो. चित्रपट हे माध्यम दृक-श्राव्य असल्याने त्याचा प्रभावी परिणाम समाजातील विविध घटकांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या होतो. साहित्यातील कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, आत्मकथने, नाटके आदि साहित्य प्रकारावर सतत चित्रपटांची निर्मिती होत आहे. साहित्य आणि चित्रपटांच्या कक्षा प्रचंड रुंदावल्या आहेत. ठराविक प्रदेशाचाच विषय, ठराविक प्रदेशाचीच प्रमाणभाषा साहित्यनिर्मितीसाठी न वापरता शहरी, ग्रामीण, दलित, भटके, आदिवासी या समाजातील भणंग लोकजीवन, त्यांच्या परंपरा, त्यांचा व्यवसाय, त्यांची बोलीभाषा यांचे चित्रण साहित्यातून सतत मांडले जातात. परंतु चित्रपटांमध्ये अशा आशयाच्या त्या – त्या समाजातील बोलीभाषा आणि व्यवसाय यांचे चित्रण खूप कमी प्रमाणात दिसते. दिग्दर्शक हा खूप चांगला वाचक व समीक्षक असतो. साहित्यप्रकारातील विविधांगी विपुल वाचन तो करत असतो. दिग्दर्शकाला त्या साहित्यकृतीतील जाणिवा, संघर्षाचे चित्रण, वेगळ्या अंगाने व निराळ्या भूमिकेतून मांडलेला विषय, ज्वलंत प्रश्न, वास्तव घटना आशा स्वरूपातील लेखन चित्रपटनिर्मितीसाठी खुणावत असतात. अशा सकस आणि दर्जेदार साहित्यकृतींचे निर्माते व दिग्दर्शक चित्रपटांमध्ये माध्यमांतर करतात. साहित्याच्या निर्मितीनंतर फक्त सुशिक्षित वर्गच त्या साहित्याचे वाचन करू शकतात. ही साहित्यनिर्मितीची मर्यादा होय, परंतु त्याच साहित्यकृतीचे चित्रपटात माध्यमांतर झाले तर निरक्षर ते समीक्षकांपर्यंत त्या लेखकाचे विचार व दृष्टिकोन पोहोचविता येतो. किंवा वाचक व प्रेक्षक त्या साहित्यकृतीला चित्रपटांच्या माध्यमातून अनुभवू शकतात. साहित्यकृती पेक्षा चित्रपटाचे प्रेक्षक, अभ्यास अधिक असतात. म्हणून लोकप्रिय आणि चांगल्या साहित्यकृतीवर दर्जेदार चित्रपट बनविण्याची मोठी जबाबदारी दिग्दर्शकावर येते. चित्रपटांमध्ये पात्रे, संवाद, संगीत, प्रकाशयोजना, इत्यादींच्या साहाय्याने चित्रपटांची कथा, पटकथा एक सलग दृश्यांचा पट जिवंत अनुभव प्रेक्षकांना देते. म्हणून प्रेक्षकांच्या मनावर चित्रपटांतून मनोरंजन व प्रबोधन करणे सोयीचे होते. एक चित्रपट इतर भाषेमध्ये माध्यमांतरीत होत असेल तर त्याचा प्रेक्षकांवर प्रभाव जाणवतो. आज जुन्या गीतांचे, चित्रपटांचे रिमिक्स हिंदी चित्रपटांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. चित्रपटातील तोचतोपणा प्रेक्षकांना समीक्षकांना खूप काही नवीन देऊ शकत नाही. म्हणून आज दर्जेदार कथा-पटकथांची गरज दिग्दर्शकाला भासते. ही गरज एखाद्या साहित्यकृतीतून देखील दिग्दर्शक पूर्ण करत असतो. अनेक साहित्यातील कलाकृतींवर दर्जेदार चित्रपटांची निर्मिती झालेली आहे. डॉ. राजेंद्र थोरात यांनी ‘कुंकू ते दुनियादारी’ या ग्रंथाच्या माध्यमातून साहित्य आणि चित्रपटांची वाटचाल अधोरेखीत केली आहे. साहित्य आणि चित्रपटातील वेगवेगळ्या समाजजीवनातील निवडक अनुभव या कलाकृतीत प्रामाणिकपणे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. कादंबरी ते सिनेमा पर्यंतचा प्रवास या ग्रंथामध्ये संशोधनात्मक पद्धतीने सांगितलेला आहे.

ह ना आपटे यांच्या कोरेगाव येथील सत्य घटनेवरील न पटणारी गोष्ट या कादंबरीवर १९३७ मध्ये व्ही शांताराम यांनी ‘कुंकू’ या सिनेमातून सामाजिक विषयावर भाष्य केले आहे.साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या कादंबरीवर आधारित १९५३ मध्ये आचार्य अत्रे यांनी आईची महती ‘श्यामची आई’ या चित्रपटातून साने गुरुजी यांची आत्मकहाणी सांगितली आहे.
व्यंकटेश माडगूळकर यांच्या बनगरवाडी या प्रसिद्ध कादंबरीवर १९९५ मध्ये अमोल पालेकर यांनी ‘बनगरवाडी: एक भिंती नसलेले गाव’ नावाचा सिनेमा प्रदर्शित केला त्यातून धनगरांचे लोकजीवन प्रतीत होते.

गो.नी.दांडेकर यांच्या ‘जैत रे जैत’ या कादंबरीवर जब्बार पटेल यांनी १९७७ मध्ये ‘जैत रे जैत’ चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात ठाकर समाजातील धाडशी व संघर्षशीलतेची कहाणी प्रदर्शित केली आहे.हा चित्रपट कसा ‘संगीतमय’ आहे याचे विवेचन डाॅ.राजेंद्र थोरात यांनी केले आहे.साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या वैजयंता या कादंबरीवर १९६१ मध्ये गजानन जागीरदार यांनी ‘वैजयंता’ या चित्रपटातून तमाशा कलेतील वास्तव प्रेक्षकांसमोर प्रदर्शित केले आहे.शांता गोखले यांच्या रीटा वेलिणकर या कादंबरीवर आधारित २००९ मध्ये रेणुका शहाणे यांनी ‘रिटा’ या चित्रपटातून समाजव्यवस्थेने स्त्रीला स्त्री म्हणून कसे उपेक्षित ठेवले. पारंपारिक व्यवस्थेमध्ये स्त्रीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत स्वतःकडे बघण्याचा अँगल बदलला पाहिजे असा संदेश दिला आहे.

चारुता सागर यांच्या दर्शन कथेवर तसेच राजन गवस यांच्या भंडारभोग व चौंडकं या कादंबरीवर आधारित २००९ मध्ये संजय पाटील व राजीव पाटील यांनी ‘जोगवा” या सिनेमातून जोगते – जोगतिणींच्या आयुष्यातील विदारक वेदनांचे चित्रण केले आहे. अजय-अतुल यांच्या संगीतामुळे हा सिनेमा अफाट लोकप्रिय झाला. आनंद यादव यांच्या नटरंग या कादंबरीवर आधारित २०१० मध्ये रवी जाधव यांनी नटरंग हा सिनेमा प्रदर्शित केला. तमाशातील कलावंतांचे जगणे, त्यांच्यावर होणारे अत्याचार, नाच्याची होणारी बदनामी, फलकं, हेमला असे हिनवणे यांचे वर्णन कादंबरी व सिनेमातून आले आहे. नटरंग कादंबरी व सिनेमा दर्जेदार असून वाचक व रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हेच या कलाकृतीचे यश आहे.

सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी या कादंबरीवर संजय जाधव यांनी 2013 मध्ये दुनियादारी सिनेमा प्रसिद्ध केला. मैत्रीसाठी जीवाचं रान करणारे जिगरी दोस्त, कट्यावरची धमाल, तसेच कादंबरी व चित्रपटातील पात्रे वाचक व प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. इत्यादी चित्रपटांच्या निर्मितीप्रक्रियेचा प्रत्येय वाचक आणि प्रेक्षकांना येतो. साहित्य आणि चित्रपट याकडे किती सूक्ष्मपणे पाहायला हवे याचा प्रत्यय हा ग्रंथ वाचताना जाणवते. साहित्य आणि चित्रपट या संशोधनात्मक व तुलनात्मक अनुबंधांतून ‘कुंकू ते दुनियादारी’ हा ग्रंथ साकार झाला आहे.’माध्यमांतर’ या विषयावर लेखन करणारे खूप मोजके लेखक आहेत. या विषयावर विविध अंगाने लेखन करणाऱ्या नवोदित लेखकांना या मौलिक ग्रंथाचा उपयोग होईल. साहित्य आणि चित्रपटांचा अभ्यास करताना मला हा ग्रंथ मार्गदर्शक वाटतो.

प्रा.प्रवीण जाधव
संपर्क क्रमांक ९६०४१११३०५
मराठी विभाग प्रमुख,
श्री मुलिका देवी महाविद्यालय निघोज
ता.पारनेर,
जि.अहमदनगर


‘कुंकू ते दुनियादारी’
डाॅ.राजेंद्र थोरात
चपराक प्रकाशन,पुणे
संपर्क:७०५७२९२०९२
पृष्ठ-१२८
मूल्य-१३०

3+
Posted on

सर्वसामान्याच्या बांधापर्यंत पोहचलेलं ‘जू’

0

आपलं जग केवढं तर आपापल्या डोक्याएवढं तसचं माणसाचं जीवन कसं तर ज्याला त्याला समजेल तसं.’ हे आत्ता सूचण्याचं कारण नुकतीच ‘जू’ ही कादंबरी वाचून काढली. प्रत्येकाचा जीवन संघर्ष वेगळा असतो; जो वाचताना आपल्याला नवे अनुभव देतो, समृद्ध करून जातो याची प्रचीती ही कादंबरी वाचताना सतत येते. पूर्वी एकेका साहित्यिकाने मराठी साहित्यावर वर्चस्व गाजवलं. त्यांचा प्रभाव इतका होता की, तो समग्र कालखंडच त्यांच्या नावाने ओळखला जावू लागला. आता मात्र साहित्यात विशेषत: मराठीत विविध परिसरातील विविध जीवनानुभव घेतलेले साहित्यिक आपण जीवन- विचारविश्व मांडत आहेत. इतकंच नाही तर, सोशल मिडियासारख्या प्रभावी माध्यमांमुळे ते सर्वदूर पोहोचत आहेत. कथा, कविता आणि कादंबरी यासोबतच फेसबुकवर आपले हे वर्चस्व राखणा-या अलिकडच्या तरुण मराठी साहित्यिकामध्ये नाशिकच्या ऐश्वर्य पाटेकर यांचे नाव आघाडीवर आहे.

Image may contain: drawing

नाशिकपासून साधारण ६० कि.मी. अंतरावर राहणा-या आणि साहित्य अकादमीचा पहिला युवा साहित्य पुरस्कार जिंकणा-या मराठीतील या सारस्वताला खरी ओळख मिळाली ती त्यांच्या `भुईशास्त्र’ या काव्यसंग्रहामुळे! २०११ मध्ये प्रकाशित झालेल्या या संग्रहाने महाराष्ट्रातील सर्व मानाच्या पुरस्कारांसह साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कारही जिंकला. साहजिकच, त्यांच्या पुढील पुस्तकाबाबत साहित्यातील जाणकार व रसिकांना उत्सुकता होती. ती पूर्ण झाली २०१६ मध्ये ‘जू’ या कादंबरीच्यारुपाने…या कादंबरीने समीक्षक, साहित्यिक, रसिक यांचे समाधान तर केलेच; पण मोठया प्रमाणात सातत्याने न वाचणारा सर्वसामान्य वाचकही नव्याने जोडला.

अनेक जाणकारांनी `जू’चे नवी कादंबरी, वेगळी कादंबरी म्हणून स्वागतही केले पण एक वाचक म्हणून मला या कादंबरीचे सगळयात मोठे यश हे जाणवले की, ही कादंबरी सर्वसामान्यांच्या मनापर्यंत पोहोचली आणि तिने अनेक साहित्यबाहय घटकांना बोलतं केलं. सर्वसामान्य वाचकांचे प्रेम गेल्या पाच- दहा वर्षांत ज्या मोजक्या पुस्तकांना मिळाले त्यात या कादंबरीचा क्रमांक बराच वरचा आहे. वाचनसंस्कृती कमी झाली आहे. नवी पिढी वाचत नाही अशी ओरड होणा-या आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या काळात या कादंबरीने वय वर्ष दहा ते नव्वद अशी शेकडो सर्वसामान्य माणसे जोडली.

मराठीतील ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ. रा. रं. बोराडे, डॉ. द. ता. भोसले, बाबाराव मुसळे, नागनाथ कोत्तापल्ले, अरुणा ढेरे, मिलिंद जोशी, कौतिक ढाले- पाटील, अभिराम भडकमकर, प्रा. बी. एन. चौधरी, कमलाकर देसले, आबा महाजन या साहित्यातील दिग्गजांनी जसे आपले मत- निरीक्षण नोंदविले तसेच अनेक सर्वसामान्य वाचकांनी आपल्या भाषेत, उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया पाटेकरांच्या फेसबुकवर नोंदविल्या, फोनवर कळवल्या तर काहींनी पत्रातूनही व्यक्त केल्या.

काय आहे `जू’ तर एका मुलाची, त्याच्या कुटुंबाची विशेषत: त्याच्या आईच्या जीवनसंघर्षाची कहाणी. जग विरोधात गेले तरी चालते फक्त रक्ताचे सोबत पाहिजे जग जिंकता येते. पण इथे तर त्या मुलाचे वडिल, आजी, आत्या, मामा, चुलते सारे विरोधात एकवटतात. काहीही गुन्हा नसताना या स्त्रीला एकाकी पाडले जाते, तिच्या हक्कांपासून वंचित केले जाते. थोडक्यात, तिच्यावर स्वकियांकडून अन्याय होतो. ती आपल्या चार मुली आणि एका मुलाला वाढविण्यासाठी उघड्यावर जगते, दिवसरात्र कष्ट करते आणि समोर येणाऱ्या संकटांना धीराने तोंड देते. त्यावर मात करते आणि आला दिवस ढकलत पुढे चालत राहते. या संघर्षाची तुलना होवू शकत नाही कारण प्रत्येक लढाई वेगळी असते आणि ती वेगवेगळया रणांगणांवर लढली जाते. इथे सारे जग एकीकडे असताना त्या आईचा संघर्ष संतांनी सांगितल्याप्रमाणे अंतर्बाहय स्वरुपाचा आहे. नातेसंबंध, त्यांच्या अपेक्षा, त्यांचा एकांगी विचार, आरोप, कोर्ट- कचे-या, त्यातील दु:खे, उपासमार अशा विविध यातनांशी या माऊलीची रोजच गाठभेट आहे. ‘जू’ वाचून आपण अंतर्मुख होवून स्वत:च्या जीवनाकडे अधिक गांभीर्याने पाहू लागतो. छोटयामोठया गोष्टीसाठी कुरकुरणा-या आपल्याला आपलीच लाज वाटू लागते. कुणाला ही कादंबरी म्हणजे त्या मुलाची भावडयाची वाटचाल- आत्मकथन वाटते, कुणाला त्याच्या आईची जीवन- संघर्षकहाणी, कुणाला ती बदलते मानवी स्वभाव- स्वार्थीपणाचे चित्रण वाटते तर कुणाला चार पिढयांचे समग्र चित्र काढणारी साहित्यकृती. अनेकांना मात्र ती ग्रामीण भागातील एका सक्षम (खमक्या) महिलेची लढाई वाटते. पुरूषप्रधान जोखडातून स्त्रीला दुबळी मानणाऱ्या संकुचित मनोवृत्तीला ही चपराक आहे.

खरे तर, मराठीत ग्रामीण साहित्य विपुल आणि विविध प्रकारे लिहिले गेले आहे. या लिहिणाऱ्यांपैकी अनेकांची नाळ आनंद यादव यांच्याशी घट्ट आहे. ऐश्वर्य पाटेकरही त्याला अपवाद नाहीत. मात्र ते या मातृसंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सुख-दु:खासह; जो भवताल, जे गाव आणि समकालीन चित्र रेखाटतात ते सामर्थ्याने आणि सर्वांगीण स्वरुपात येते. अनुभवसंपन्नता, अस्सल अनुभूती आणि ओघवत्या लेखन शैलीमुळे वास्तव ग्राम्यजीवन पाटेकर प्रभावीपणे व तितक्याच प्रत्ययकारी पद्धतीने मांडतात. या लेखनात उत्स्फूर्तता तर आहेच पण त्याचसोबत एक विशिष्ट संयम पण आहे. आततायीपणा, राग-द्वेष या भावनांना नियंत्रित ठेवून रेखाटलेले हे जीवन वाचणाऱ्याला सकस अनुभव देते. विचार संपन्न करते. म्हणून अगदी दहा वर्षांच्या मुला-मुलीपासून तर नव्वद वर्षांचे वयस्कसुद्धा भारावलेपणातून `जू’वर अभिव्यक्त होतात. मला वाटते, ही कादंबरी बहुजन समाजाच्या आत असणाऱ्या विविध वृत्ती- प्रवृत्ती, समग्र गावगाडयाचे व त्यातील भावभावनांचे चित्रीकरण आहे. ‘भुईशास्त्र’च्या यशाची पुढची पायरी म्हणून `जू’कडे पाहता येते. तसेच, मराठी कादंबरीच्या मांडणीची नवी वेगळी सुरुवात म्हणूनही ही कादंबरी काही नवे सांगू पाहते. ज्यांना बदलता गाव, समग्र ग्रामीण जीवन आणि तेथील जगण्यातील ताणेबाणे समजावून घ्यायचे आहेत, त्यांनी ही कादंबरी वाचलीच पाहिजे असे ठामपणे सांगता येते.

डॉ. राहुल अशोक पाटील

Continue reading सर्वसामान्याच्या बांधापर्यंत पोहचलेलं ‘जू’

0
Posted on

मन क्षितिजावरती… पुस्तक परिचय – बापू भोंग

1+

मन क्षितिजावरती…

सौ.राणी कदम लिखित काव्य संग्रह आयुष्यातील अनेक भावनांचे विश्व सांगणारी कलाकृती डोळ्यांसमोर अनेक चित्र उभे करते.
आव्हान देईल एखादी गझल
नीट बघ जरा
भिनव रक्ताच्या कणाकणात
अन् सामोरा जा जरा……..
खरच आपले आयुष्य अनेकदा आव्हानच होऊन बसते.जेव्हा दुःख सागरापेक्षा ही मोठे होऊन बसते .अन् त्यातूनच कवयत्री सामोरे जाण्याचा प्रयत्न करते अन् ति पुढे म्हणते.
आठवां मधून पाझरुन
पुन्हा थकून नाही जाव
आयुष्याच्या चित्रात
रंग नवीन भराव…….


हे आगदी खर आहे माणसाला आयुष्यात कितीही दुःख ,वेदना झाल्या तरी कधीच थकून नजाता प्रत्येक संकटाला सामोरे गेले पाहिजे.अन् आपले आयुष्य आनंदाने घालवले पाहिजे .म्हणजे अनेक प्रकारचे रंग या संसारात भरावेत,
मन थेंब आठवांत डूबता
मन वेंदनात हरवूनी जावा
भिजल्या मनात असा
मन प्रिय धावून यावा…..
माणसाच्या आयुष्यातील दुःख कधीच संपत नाही . आपले मन रमवण्यासाठी जुन्या आठवणीत जाते.अन् ति प्रियकराला म्हणते अरे माझे दुःख ,वेदना ,माझे संकट वाटून घेण्यासाठी कधीतरी धावून ये.
तुझ्या उबदार मिठीत
मला हरवून जायचंय……
तुझी मला आठवण आली आहे आणि तुझ्यात मला हरवून जायाचे आहे.पण,…
व्याकूळ तुझ्या भेटीसाठी
तू कधी भेटलाच नाही
साथ ती एकदुज्याची
तू आलाच नाही ………
प्रत्येकाच एक स्वप्न असत.पण ते निरागस असते त्या मुळे स्वप्न स्वप्नच राहत.अन् प्रत्येक जण केव्हाना केव्हा तरी जुन्या आठवणीच्या विहरात जातो .पण ति प्रिय व्यक्ती कधीच येत नाही आपण मात्र उगाच मनातून जळत राहतो.
ति पण येत नाही अन् तो पण येत नाही.म्हणून ती पुढे लिहते.
विरहच तो आनंद मानते
नको ती भेट पुन्हा ……
खर तर लिहण्या सारख खूप आहे पण असो मर्यादा आहेत .
एकंदरीत काही रचना सोडल्यातर कविता संग्रह खूपच वाचनीय झाला आहे.
आपणांस पुढील लिखाणास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा .असच छान छान लिहत चला .अन् आपले आयुष्य आनंदाने जगत चला .
कळावे .
आ.नम्र
बापू भोंग
लेखक,कवी
इंदापूर ,पुणे
9763989823

1+
Posted on

‘अस्वस्थ नोंदींचा हिशेब’

2+

-सुरेंद्र गोंडाणे
surendra.gondane@timesgroup.com
…..
पी. विठ्ठल. विद्यमान मराठी साहित्य परंपरेतील महत्त्वाचे सर्जनशील कवी. ‘माझ्या वर्तमानाची नोंद’ या २०११मध्ये प्रकाशित काव्यसंग्रहानंतर तब्बल सहा वर्षांनी ‘शून्य एक मी’ हा काव्यसंग्रह त्यांनी वाचकांसमोर ठेवला आहे. एकीकडे कवितांचा ‘काऊंट’ वाढवून ‘लाइक्स’ची संख्या मोजणाऱ्यांची संख्या वाढत असताना पी. विठ्ठल यांच्यातील काव्यसंवेदना संयत तरीही अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांचे मोहोळ घेऊन येते. ‘शून्य एक मी’ हा काव्यसंग्रह म्हणजे कवीच्या सर्जनशीलवृत्तीला पडलेल्या प्रश्नांचा मोहोळ आहे. त्यामुळेच संवेदनशीलता आणि प्रतिभेचा अंगभूत स्थायीभाव असलेल्या त्यांच्या कवितेतील प्रतिमा-प्रतिकांतून अस्सल जीवनानुभवाचे दर्शन घडते. जगण्यातल्या वास्तवाकडे अत्यंत संवेदनशीलपणे बघणाऱ्या पी. विठ्ठल यांच्या कवितेतील प्रतिमा-प्रतिकांत जसे माणसाच्या झालेल्या शहरीकरणाचे चित्र आहे, तसे त्यांचा भवताल अधोरेखित करणाऱ्या ग्रामीण जीवनातील चित्रणही तेवढ्याच ताकदीने आले आहे. त्यामुळे ग्रामीण जीवन ते माणसाचे झालेले शहरीकरण हा प्रवास उलगडताना कवीतील सर्जनशील जाणिवा सामाजिक, राजकीय, आर्थिक विषमतेकडे लक्ष वेधतात. या तिन्ही वेष्टनाखाली दबलेल्या कारुण्यमयी जीवनाच्या अस्वस्थ हुंकारात त्यांची कविता आकार घेते. त्यामुळे पी. विठ्ठल यांच्या कवितेतील ‘शून्य एक मी’चा शोध अनेकार्थानं शोषितांच्या जीवनानुभवाशी येऊन प्रत्येकाच्या समाजभानाला आव्हान देतो; तसा तो चंगळवादी, भौतिकवादी मानसिकतेतील अस्वस्थेच्या रुपाने प्रकट होत ‘माणूस’ म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाच्या आत्मभानालाही साद घालतो.


‘शून्य एक मी’ या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावरूनच संग्रहातील गूढगर्भी, वलयांकित अस्वस्थ नोंदी असलेल्या अंतरंगाचा वास्तवाभास अस्वस्थ करतो. कदाचित ‘अस्वस्थता’ हेच आपल्या जाण्याचे वास्तव असावे. कारण, जोपर्यंत आपण अस्वस्थ होत नाही तोपर्यंत आपल्या अंतरंगात साचलेलं… अनेकदा आपल्याला आतल्या आत ओरबाडून काढणारं ‘शब्द’ होऊन बाहेर येत नाही. ‘शून्य एक मी’ हा काव्यसंग्रह म्हणजे पी. विठ्ठल यांच्यातील अस्वस्थतेचे शब्दरूप आहे. त्यामुळेच या संग्रहातील प्रत्येक कविता जगण्यातलं मूल्यभान घेऊन येणारी आहे. ‘माझ्या जगण्याची संहिता’ या पहिल्याच कवितेतून जगण्याकडे चिकित्सकतेने बघण्याच्या पी. विठ्ठल यांच्या नजरेचा प्रत्यय येतो…

अभिरुचीचे केंद्र हलले आहे आपले
गोपनीय गोष्टींनाही प्रतिष्ठा मिळत गेली हळूहळू
आणि शोकेसमध्ये कधी येऊन उभी राहिली न्यूड बाहुली
कळूच दिलं नाही माझ्या एकरेषीय जगण्यानं

आपलं जगणं आपण भौतिक सुविधांच्या वेष्टणांत लपेटून घेत त्याला सजवित असतो. मात्र, माणूस म्हणून आपलं नग्नपण लपवणं इतकं सहजसोपं असतं काय? हा अस्वस्थ आणि सार्वभौम सवाल कवी पी. विठ्ठल यांची कविता विचारते. ‘हुसेनची अचानक मौल्यवान होणारी चित्र अन् कबीर, तुकारामावर साचत चाललेली धूळ’, या प्रतिकांतून आपलं एकरेषीय जगणं मूल्यरेषांपासून ढासळत चालल्याचं वास्तव कवी प्रभावीपणे शब्दबद्ध करतो. त्यानंतरच्या प्रत्येक कवितेतील वेगवेगळ्या संदर्भजाणिवांतून हा अस्वस्थ कोलाहल वाचकांना जगण्याच्या परिमाणांमागील वास्तवाशी समरस करतो.

गावातल्या बीएएमएस डॉक्टरानं शरीर थंड
पडल्यावरही लावून दिली सलाइन
टपकणाऱ्या थेंबाकडं बघून डोळे गोठून गेले तरी
पेशंट हलेना तेव्हा कुणी तरी म्हणालं,
‘लाकडं गोळा करा’
इतका कसा क्रूर असतो सामांन्याचा मृत्यू

‘दुसऱ्या जगातल्या माणसांबद्दल…’ या कवितेतील वरील ओळींतून पी. विठ्ठल यांनी शब्दबद्ध केलेलं माणसाच्या अधांतरी जगण्याचं वास्तव प्रत्येक संवेदनशील मनाला सुन्न करते. या कवितेतून व्यक्त झालेला जगण्यातला विरोधाभास अधिक हेलावून सोडतो… संग्रहातील प्रत्येक कवितेतील प्रतीमा-प्रतिकांतून व्यक्त होणारा हा अस्वस्थ भवताल चंगळवादी मानसिकतेवर प्रहार करतो. ‘पाणी’ या कवितेतील पुढील ओळींतून पी. विठ्ठल हे समाजातील बेगडी प्रवृतींचा नेमकेपणाने बुरखाफाड करतात…

दाबून धरा नाक
तोंडावरती लावून घ्या मास्क
महासत्तेचा काळा ढग फुटलाय पुन्हा
आणि गटार गटारीसारखीच वाहतेय

आपण लोकशाही मूल्यांच्या कितीही गप्पा मारल्या, तरी प्रत्यक्षात मात्र माणसामाणसांतील दरी वाढत आहे. चंगळवादी मानसिकतेनं इथल्या शेवटच्या माणसापर्यंत त्यांच्या हक्काचंही पोहोचू दिलं नाही, हे अस्वस्थ वर्तमान पी. विठ्ठल यांची कविता तेवढ्याच ताकदीने शब्दबद्ध करते. ‘घर सजवायचं असतं म्हणून’ या कवितेतून माणसाचं जगणं किती बेगडी होत चाललंय याचं चित्रण आणि शहराच्या सिमेंटच्या भिंतीआडचं जगणं बघून स्वत:चंच अस्तित्व शोधणारा बाप पी. विठ्ठल यांच्यातील कवीला खोलवर अस्वस्थ करतो…

बापाची आश्वासक नजर फिरते घरभर
आणि भव्य वगैरे असणारं घर
केविलवाणं दिसू लागतं

घरासारखं बापाला सजवता येत नाही
बाप घरापेक्षाही थोर असतो

एकीकडे अशी स्वस्थता दाटून येत असताना ‘मुली’ या कवितेतून कवी आश्वासकपणे व्यक्त होतो. परंपरेचा पदर झुगारून देत भूतकाळातील पुरातन ओझं दूर सारणाऱ्या ‘मुली’ कवीला नवोत्कर्षाची निरभ्र पहाट फुलविणाऱ्या भासतात…

दफ्तरांच्या ओझ्यानं दबणारी पावलं
आता तुडवत नाहीत
चिखलमातीचा प्रतिगामी रस्ता
त्यांच्या आतूनच उमलून आलंय एक
स्वाभिमानाचं सुंदर फूल
जे कोमेजणार नाही कधीच कुठल्याही
पुरुषी अहंतेनं किंवा
उखडूनही पडणार नाही कुठल्याच
सुनामीनं!

‘आपण सारे शून्य..!’ ही कविता जगण्यातील वास्तवाचं तत्त्वचिंतन मांडणारी आहे. माणसाच्या देहाचे अस्तित्व क्षणात नाहीसे होतात; हे सांगताना, माणसं पोरकी होण्यासोबतच निस्तेज होणाऱ्या घराच्या भिंती, आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तीने वापरलेल्या चष्मा, काठी, कपडे, चपला अशा वस्तू बेवारस होण्याची प्रतिमा पी. विठ्ठल यांच्यातील प्राध्यापक, सर्जनशील कवी, समीक्षक संवेदनशीलपणे उलगडत जातो.

शेवटी काय?
–तर माणूस शून्य
त्याच्या भावना शून्य
त्याचे अस्तित्व शून्य

असं सांगत माणसाच्या आयुष्यातील शून्याची ‘बेरीज’ जीवनातील ‘वजाबाक्यां’चंच गणित मांडत जाते. माणसाला आपल्या आयुष्यील ‘शून्या’ची सांगड घालता आली पाहिजे, हा आशावाद समाजाला मानवतेचा विचार देणारा आहे. कॉन्टिनेन्टलतर्फे प्रकाशित ‘एक शून्य मी’ या काव्यसंग्रहाचे दिनकर मनवर यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ या काव्यसंग्रहाचा आशय वाचकांपर्यंत नेमकेपणाने पोहोचविणारे आहे. एकूणच ‘एक शून्य मी’ हा पी. विठ्ठल या संवेदनशील कवीचा संग्रह मानवी अस्वस्थता उलगडण्यासोबतच माणसाच्या जगण्याकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी जागविणारा आहे, तसा तो मराठी काव्यपरंपरेतील आपल्या अंगभूत सशक्ततेने माणसाच्या जगण्याच्या नोंदी मांडणारा आहे.
……..
‘शून्य एक मी’ (कवितासंग्रह)
कवी : पी. विठ्ठल
प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
पृष्ठ : १२८
किंमत : १५० रुपये
…………………

2+
Posted on

नागराज मंजुळे यांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक वाचलंच पाहिजे राव

0

माध्यमान्तराचा अभ्यासयुक्त धांडोळा

डॉ. प्रकाश शेवाळे

“साहित्यकृतीचे माध्यमांतर” ही अतिशय महत्वाची व निरंतर चालणारी यंत्राधिष्ठित प्रक्रिया आहे. साहित्यकृतीच्या माध्यमांतराची बीजे त्या त्या साहित्यकृतीच्या आशय, कथनशैली व दृश्यात्मकतेमध्ये असतात. साहित्यकृतीचे माध्यमांतर हा विविधांगी दृष्टिकोनातून आजच्या काळातील अतिशय महत्वाचा व कलावंतांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. संशोधनाचे व समीक्षेचे विविध परिप्रेक्ष्य माध्यमांतराच्या अभ्यासातून निर्माण झाले आहेत व आज निर्माण होत असतांना आपणास दिसतात. साहित्य व माध्यमांचा आंतरविद्याशाखीय अभ्यास समतोल व सखोल समीक्षेसाठी आवश्यक आहे आणि नेमका ह्याच महत्वाच्या व उपयुक्त अशा विषयावर डॉ. राजेंद्र थोरात यांनी “साहित्यकृतीचे माध्यमांतर” या ग्रंथाचे संपादन नुकतेच प्रकाशित केले.

जब्बार पटेल या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अर्पण केलेल्या या ग्रंथाला प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लाभली आहे. माध्यमांतराची प्रक्रिया मंजुळे Continue reading नागराज मंजुळे यांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक वाचलंच पाहिजे राव

0
Posted on

संग्राह्य गझल विशेषांक !- संजय शिंदे

0

 

गझल अभ्यासक व समीक्षक अरुणोदय भाटकर यांनी संपादित केलेला रत्नागिरी एक्सप्रेसचा दीपावली गझल विशेषांक वाचणे ही एक मोठी पर्वणी आहे. या अंकात साधारणपणे जुन्या-नव्या/प्रस्थापित-नवोदित अशा जवळपास शंभर गझलकारांच्या एकूण तीनशे ते चारशे रचना समाविष्ट केलेल्या आहेत.

गझलांची निवड व संपादन स्वतः अरुणोदय भाटकर यांनी केल्यामुळे गझलांच्या दर्जाबद्दल अजिबात शंका नाही. शिवाय या गझला महाराष्ट्रातील विविध प्रदेशात असणाऱ्या गझलकारांच्या असल्यामुळे या सर्वच गझलांमध्ये आशय, विचार व मांडणी यानुसार असणारी वैविध्यता इथे अनुभवायला मिळते.

या संग्रहात जशा तीस-पस्तीस वर्षं गझललेखन करणाऱ्या गझलकारांच्या रचना आहेत तशाच अगदी नवोदित असणाऱ्या गझलकारांच्याही गझला आहेत. त्यामुळे या अंकाचं संग्राह्य मूल्य निश्चितच वाढलं आहे.

मालवणी गझला, अनुवादित गझला, कोकणी गझला, अमराठी कवींच्या मराठी गझला हे विभाग या अंकाचं वेगळेपण अधोरेखित करतात. तर गझलचिकित्सा या विशेष भागातील काही लेख मराठी-उर्दू गझलेविषयी सविस्तर विचारमंथन घडवून आणतात. या भागातील सर्वच लेख विशेषतः वैवकू यांचा मराठी गझलेच्या आकृतीबंधाबाबतचा लेख नवोदित गझल लिहिणाऱ्यांना मार्गदर्शन करणारा आहे.

याशिवाय संदीप गुप्ते, शिल्पा देशपांडे, जयदीप जोशी, स्वतः अरुणोदय भाटकर, चित्तरंजन भट यांचा संक्षिप्त लेख हे सर्वच लेख वाचनानंद देणारे आहेत. मला मिळालेल्या अंकात स्वप्निल शेवडे यांचा लेखच काही तांत्रिक कारणाने अगदी थोडा छापला गेलेला आहे. या विभागात गझल या विषयावरील अजून चिंतनात्मक, चर्चात्मक, तुलनात्मक, समीक्षात्मक लेख असते तर वाचकांना गझलरचनांच्या आनंदासोबतच अजून मोठी वैचारिक मेजवानी मिळाली असती.

अंकाचे मुखपृष्ठ नंदू गवांदे यांचे असून ते अंकाच्या सौंदर्यात भर घालणारे आहे. या अंकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण अंक आर्ट पेपरवर मुद्रित केल्याने अंकाचा छपाईचा दर्जा उत्तम आहे. फक्त मांडणीत व विशेषतः अक्षरजुळणीत काही त्रुटी राहिल्या आहेत. वेलांटी व उकाराच्या चुका राहिल्या आहेत. त्यामुळे अंक वाचताना रसभंग होतो. या चुका संपादनातल्या नाहीत, तांत्रिक आहेत. पण तरी त्या टाळल्या असत्या तर अंकाचा दर्जा निश्चितच अजून उंचावला असता यात शंका नाही.

मराठी साहित्यात विशेषतः काव्यक्षेत्रात सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या गझल या काव्यप्रकारावर हा विशेषांक काढल्याबद्दल संपादिका नमिता कीर व अतिथी संपादक अरुणोदय भाटकर यांचे अभिनंदन करणे महत्वाचे आहे.

गझलगाथा या नावाने या सर्व गझलांचा एकत्रित असा एक नवा ग्रंथ येतो आहे असे अरुणोदय भाटकर यांनीच कळवले. तसे झाल्यास येणारा गझलगाथा हा ग्रंथ गझल रसिकांसाठी अविस्मरणीय ठरेल यात अजिबातच शंका नाही !
तूर्तास, या अंकासाठी अरुणोदय भाटकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील गझलगाथा ग्रंथासाठी शुभेच्छा !

अंकासाठी संपर्क :

Arunoday Bhatkar :
98191 54411

 

Continue reading संग्राह्य गझल विशेषांक !- संजय शिंदे

0
Posted on

राजीव खांडेकर लिखित ‘हार्ट टू हार्ट’बाबत- प्रवीण दाभोळकर

0

राजीव खांडेकर सरांचं “हार्ट टू हार्ट” पुस्तक परवा लायब्ररीत दिसलं. त्यांनी घेतलेल्या मुलाखती लोकसत्ता मध्ये “हार्ट टू हार्ट” कॉलम ने त्यावेळी यायच्या..त्याच हे पुढे जाऊन पुस्तक झालं. साधारण २८ जणांच्या यात मुलाखती आहेत.

ठरविक प्रश्न आणि त्याची उत्तर अस मुलाखतीच एक सर्वसाधारण स्वरूप आपल्या डोक्यात फिट्ट असत. किंवा मुलाखत सुरू असताना मुद्दे काढून ठेवायचे नंतर त्या मुद्द्यांवरून मुलाखत लिहायची अस आपण करतो. पण मुलाखत घेताना कोणत्याही नोट्स न काढता एखाद्याशी निवांत गप्पा मारायच्या आणि नंतर त्याच व्यक्ती चित्र शब्दातून उभं करायचं हे अशी मुलाखत घेण्याची राजीव सरांची स्टाईल.
सुरेश प्रभू, आशुतोष गोवारीकर, सुप्रिया सुळे, निळूभाऊ फुले, वामनराव पै, रामदास पाध्ये, लोकशाहीर विठ्ठल उमप आशा अनेकांचा प्रवास यातून नव्याने कळतो.

साधारण १५ वर्षापूर्वीच हे पुस्तक असावं. कारण कालानुरूप काही संदर्भही आता बदलत गेलेयत.
मायक्रोबायोलॉजीतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या खा. सुप्रिया ताईं तेव्हा “लर्निंग डीसॅबिलिटी” विषयावर आणि यशवंत राव चव्हाण प्रतिष्ठाच्या माध्यमातून काम करीत होत्या. “डायनिंग टेबलवर बसून राजकारणावर चर्चा करणे एक मर्यादेपर्यंत ठीक वाटते, त्यांनतर मला तेही फारसे आवडत नाहीत” असे सुप्रिया ताईंचे त्यावेळचे वाक्य होते. आज प्रभावी खासदार म्हणून राजकारणात सक्रिय आहेत.

अभ्यासू, कल्पक, ध्येयवेडे असे सुरेश प्रभू मात्र याला अपवाद ठरतात. प्रभू आणखी १० वर्षांनी आता इतकेच प्रभावी असतील का? की जाती धर्माच्या राजकारणाला कंटाळून ते बाहेर पडतील? ते या वातावरणात कितपत टिकतील अशी शंका मुलाखती नंतर व्यक्त केली होती. काही महिन्यांपूर्वी रेल्वे मंत्री असलेले प्रभू मुलाखत घेतली तेव्हा संयुक्त राष्ट्रांच्या औद्योगिक परिषदेवर वरिष्ठ सल्लागार होते.

निळू भाऊ, वामनराव पै आणि विठ्ठल उमप यांच्याशी झालेले “हार्ट टू हार्ट” पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे आहे.
खलनायक म्हणूनच परिचित झालेल्या निळूभाऊंना अपमानास्पद प्रसंगांना सामोरे जावे लागलं. कधी कुठे घरातही प्रवेश नाकारण्यात आला तर कधी शिव्याही पडल्या.

जांभूळ आख्यान पाहताना कर्णावर जीव ओवाळून टाकणारी द्रौपदीच साक्षात विठ्ठल उमप यांच्याजागी दिसायची. वयाच्या ७५ नंतरही हा जोश कुठून येतो यावर त्यांच ठरलेलं उत्तर ते द्यायचे.

लोकांच्या भीती, दुःखाचा फायदा घेणाऱ्या बुवाबाजीच्या काळात “कोणी साधू किंवा संत नाही, जीवनविद्या मार्गदर्शक” अशी ओळख झालेले तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे सांगणारे वामनराव पै. यांचा मंत्रालयाच्या नोकरीपासून ते ‘जीवनविद्या’ पर्यंतचा प्रवासही जाणून घेण्यासारखा आहे.
अजून खूप जणांच्या त्यावेळच्या कथा उलगडत जातील. सई परांजपे, अमोल पालेकर, अतुल कुलकर्णी, पैलवान मारुती माने असे अनेक.
#हार्टटूहार्ट #राजीवखांडेकर

भाग २ लवकरच…

-#प्रविणदाभोळकर

0
Posted on

मराठीतील एकमेव म्हणता येईल असे एक पुस्तक ‘पुरुषत्वाच्या प्रतिमा’: चारू गुप्ता

0

हरिती घेऊन येत आहे
मराठीतील एकमेव म्हणता येईल असे एक पुस्तक
|| पुरुषत्वाच्या प्रतिमा : चारू गुप्ता ||
अनुवाद – सुरेश खोले, सुरज पवार, दयानंद कनकदंडे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सांप्रदायिक तेढ निर्मितीचा इतिहास नि:पक्षपातीपणे समोर ठेवणारे
पुरुषत्व आणि दलित जाणिवेचा उगम अधोरेखीत करणारे
लव्ह-जिहादचे गुढ उकलणारे
दलित पुरुषत्वावर भाष्य करणारे पुस्तक !

असे विषय ज्यावर खूप कमी संशोधन झालेले आहे.
हे पुस्तक त्या सर्व मुद्यांना भिडते !
————————————
सांप्रदायिकता, लिंगभाव, लैंगिकता, धर्माचे राजकारण
या विषयांचा अभ्यास करणार्‍यांच्या संग्रही असावेच
असे एक महत्वाचे पुस्तक !

पाने – १४४ | मूल्य – १८०/-
३० नोव्हेंबरला पुस्तक उपलब्ध होणार
त्यापूर्वी नोंदणी करणार्‍यांना विशेष सवलत
त्वरित आगवू नोंदणी करून सवलत मिळवा
पुस्तक घरपोच पाठवू !!
संपर्क : हरिती पब्लिकेशन्स | व्हाट्सअप : 7219063604
————————————–
Hariti Publications
Books for Intervention, Dialogue and Change

0
Posted on

‘जू’ आईच्या संघर्ष-संस्कारांची गाथा- प्रा.बी.एन.चौधरी

0

||सोन्याचा सर्वा||

माझी ७५ वर्षाची आई काळजीने मला म्हणाली
“नाना? अरे कितलं वाचस. डोयास्नं तेज जाई नं भो,
असं एकसारखं वाचशी तं.”
मी म्हणालो, “माडी, तेज जानार नही,
उलट नवी दृष्टी भेटी ऱ्हायनी माले,
हाई पुस्तक वाचिसन. हाई पुस्तक नही. आरसा से.
येम्हा चेहरा दिखस आपला सोताना!”

आई म्हणाली, “काय शे रे भो येम्हा इतलं आरसासारखं निथ्थय, निर्मय.”
मी आईला ‘जू’विषयी थोडक्यात सांगितलं.
आईनं चक्क पंधरा दिवसात “जू” वाचून संपवलं अन प्रतिक्रीया दिली,
“नाना, हाई तं बावनकशी सोनं शे रे भो. धगधगती भट्टीम्हा ताई-सुलाखीसन निंघेल शेत
या भावड्या आनी तेनी माय, बहिणी. कितलं सोसं बिचारास्नी.
पन हिंमत नही हारी. येले म्हनतंस जगनं.
एक नवं जगच उभारं त्या माऊलींनी कष्ट करीसन. ”

हा मायलेकातला संवाद
प्रसिद्ध कवी आणि कथाकार प्रा. बी. एन. चौधरी
आणि त्यांची माउली यांच्यातील आहे!
खरंतर हा संवाद नाहीच
हा सोन्याचा सर्वा आहे माझ्यासाठी
या माउलीच्या तोंडून निघालेला एक एक शब्द
म्हणजे ‘जू’ ची झालेली उत्कृष्ट समीक्षा.
त्या माउलीला चरणस्पर्श करत
आपल्या समोर ठेवतो आहे
हा सोन्याचा सर्वा.

||‘जू’ आईच्या संघर्ष-संस्कारांची गाथा- प्रा.बी.एन.चौधरी||

सर्वत्र गाजत असलेलं आणि वाचायलाच हवं अशी मनात उर्मी दाटून आलेली असतांना अचानक एक दिवस पोस्टमन दादांनी एक पार्सल आणून दिलं. माझे सन्मित्र विजय पाटील यांच्या स्नेहाग्रहाने थेट लेखक ऐश्वर्य पाटेकर यांचे कडूनच मला “जू” ची अविस्मरणीय भेट मिळाली. एकदाच नव्हे तर दोन, तीनदा मी “जू” अघाश्यासारखं वाचून काढलं. माझं ते रात्रंदिवसाचं वाचन पाहून माझी ७५ वर्षाची आई काळजीने मला म्हणाली “नाना? अरे कितलं वाचस. डोयास्नं तेज जाई नं भो, असं एकसारखं वाचशी तं.” आम्ही घरात आहिराणी भाषा बोलतो. मी म्हणालो….. “माडी, तेज जानार नही, उलट नवी दृष्टी भेटी -हायनी माले, हाई पुस्तक वाचिसन. हाई पुस्तक नही. आरसा से. येम्हा चेहरा दिखस आपला सोताना.” आई म्हणाली “काय शे रे भो येम्हा इतलं आरसासारखं निथ्थय, निर्मय.” मी आईला “जू” विषयी थोडक्यात सांगितलं. तिचीही उत्सुकता चाळवली आणि आईनं चक्क पंधरा दिवसात “जू” वाचून संपवलं. संपूर्ण वाचन झाल्यावर तिची प्रतिक्रीया होती “नाना, हाई तं बावनकशी सोनं शे रे भो. धगधगती भट्टीम्हा ताई-सुलाखीसन निंघेल शेत या भावड्या आनी तेनी माय, बहिणी. कितलं सोसं बिचारास्नी. पन हिंमत नही हारी. येले म्हनतंस जगनं. एक नवं जगच उभारं त्या माऊलींनी कष्ट करीसन. ” माझ्या आईची ही प्रतिक्रियाच मला “जू” चं वास्तव अस्तित्व अधोरेखित करणारी समिक्षा वाटली.


समाजात संकटं आली म्हणजे माणसं हतबल होतात. पुरुषच नव्हे तर स्त्रीयांही स्वतःचा प्राण त्यागतात. छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वतःसह लेकरांचाही जीव घेतात. अशी नकारात्मक, निराशावादी परीस्थिती असतांना एक आई संकटांचा निकराने मुकाबला करते. स्वतः जगते. आपल्या लेकरांना जगवते. त्यांना मृत्यूच्या दारातून परत आणते. हे संकट नैसर्गिक, परक्यांनी दिलेलं नसतं तर आपल्या माणसांनी दिलेलं असतं. ज्यांनी जीव वाचवावा तेच जीवावर उठले तर कुणाला सांगायचं अशी परीस्थिती असतांना आई ही कधीही अबला, परावलंबी, हताश, हतबल नसते हे सिध्द करणारी कहाणी म्हणजे ऐश्वर्य पाटेकर याचे “जू” आहे. “जू ” जगण्याचं शास्त्र आहे. लढण्याचा मंत्र आहे, नातं टिकवण्याचं तंत्र आहे. आई प्रसंगी रणरागिणीचे रुप धारण करते तर कधी ती माया, ममतेची करुणा मूर्ती होते. अशी अनेक रुपे यात दिसून येतात.

मी अनेक आत्मकथनं वाचली आहेत. त्यातली बरीचशी मला रंजक, कलात्मक, मढवलेली, सजवलेली वाटली. मात्र, “जू” मला अकृत्रिम, प्रामाणिक आणि पारदर्शी वाटलं. जसं घडलं तसंच मांडलंय असं वाटलं. अनेकांनी अत्मकथनं लिहिली ती त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धात. आयुष्याच्या शेवटच्या पडावावर. यात स्वतःच्या महिमामंडनाचा मोहही अनेकांना टाळता आला नाही. मात्र, ऐश्वर्य पाटेकर यांनी आपल्या ऐन उमेदीच्या काळात “जू” लिहून स्वतःच्या जगण्याचं डोळस मूल्यमापन केलं आहे. अवघ्या पंधरा वर्षाचा कालावधी. मात्र, तो जिवंत करुन समोर मांडतो. हे मांडताना कुठेही स्वतःचं अवास्तव महत्त्व वाढवून घेतलेलं नाही. वरवर ही भावड्याची आत्मकथा वाटत असली तरी ती ख-या अर्थाने भावड्याच्या आईच्या जगण्याच्या संघर्षाची गोष्ट आहे. गोष्ट कसली ? हा तर एक जीवघेणा प्रवास आहे जगणं आणि मरण यातला. यातला प्रत्येक प्रसंग, घटना इतकी जोरकसपणे मांडली गेली आहे की त्याआपल्या आसपास घडत आहेत असा सतत आपल्याला भास होतो. ते इतके अकल्पित, वेदनादायी आहेत की ते आपल्याला अंतर्बाह्य हादरवून सोडतात. भावड्या हा “जू”चा सूत्रधार असून तो एका विशाल पटाला वाचकांसमोर उलगडत जातो.

“जू”ची सुरवातच आईने गायलेल्या एका ओवीने होते. चार माझ्या लेकी/ चार गावच्या बारवा/अन् माझा गं लेक बाई/ मध्ये हिरवा जोंधळा. या ओवीतच आई, भावड्या आणि त्याच्या चार बहिणी समोर उभे ठाकतात. पाटेगांवच्या इंदूबाई आणि नामदेव या दाम्पत्याला चार मुली आणि एक लेक. एकापाठोपाठ तीन मुली होतात इथून सुरवात होते आईच्या अवहेलना, दुःख आणि कष्टाची. नवरा, सासू, सासरा, नणंद सारे मिळून तिला छळतात. जगणं कठिण करतात. घरातून परागंदा करतात. ती माहेराला जवळ करते. येथे भाऊ प्रेमळ असला तरी भावजया दावेदार होतात. आई स्वाभिमान, जिद्द सांभाळत सासरी परतते. स्वतःचं घर उभं करते. घायाळ पक्षिणी आपल्या पिलांना पंखांखाली घेत त्यांचं संरक्षण करते तशी आई लेकरांची ढाल बनते. एकीकडे नवऱ्याची क्रूर, उलट्या काळजाची राक्षसी वृत्ती तर दुसरीकडे आईचं सोशीक, लढाऊ, संस्कारी, सोज्वळ नंदादीपासारखं तेवणं. मुलगा होत नाही,आवडत नाही असं म्हणून नवरा सवत आणतो.नातेवाईक जमिन हडपण्याचा प्रयत्न करतात. तरी ही माऊली संकटांना घाबरत नाही. धीराने उभी राहते. समोर संकटांचा पहाड, वेदनांची रास मांडलेली असतांना ती लेकरांमध्ये सकारात्मकतेची उर्जा पेरते. दु:खाच्या बाजारात द:खाच्या विरोधात लढण्याचं बळ एकवटते. त्या लढ्याची ही सकारात्मक गोष्ट आहे.

घरात वणवा पेटलेला असतांना सर्वबहिणींची मदार भावड्यावर एकवटलेली. तो मोठा होईल? शिकेल? साहेब होईल? आईचे दिवस पालटतील हेच त्यांच्या इवल्या डोळ्यातलं भव्य स्वप्न. भूक, संघर्ष आणि आकांशाच्या वाटेवर भावड्याला सोबत करते ती कविता. ती त्याची उपजत सोबती. हीच कविता त्याला बळ देते. त्याला शाळेत, शिक्षकात, नातेवाईक, समाजात मान मिळवून देते. त्याचा बापाला मात्र याचं कौतुक नाही. उलट सावत्र आई सोबत तो त्याच्या जीवावर उठतो. नशिब बलवत्तर म्हणून यातून तो वाचतो. या साऱ्यात माय त्याच्या पाठी सावलीसारखी उभी राहते. संस्कारांचं रोपण करते. नात्यातली नकारात्मकता, भय घालवण्यासाठी ती जगणं फुलवते. आपल्या छोट्या छोट्या गोष्टीतून आदर्श उभा करते. संकटकाळी? कठीण समयीही ती निश्चयापासून ढळत नाही. तीच्या मुखातून निघालेली वाक्य विद्यापीठीय पुस्तकांपेक्षा मोलाची वाटतात. तिच्या पायाला पडलेल्या भागांना भावड्या रात्री मलम लावतो. तेव्हा ती म्हणते “लेका, दून्यातल्या समद्या क्रिमा घेवून आला तरी त्या माझ्या भेगायपुढे हरतील. भेगामातूर हरनार नाही. त्या लढतच राहतील….. पाय रक्तबंबाळ करत !” यातून तिच्या कष्टाची व जिद्दीची व संकटांना भिडण्याची कल्पना येते. ती हार मानायला तयार नाही. स्वतःचं मुल्य तिला माहित आहे व पुढे बरे दिवस येतील हे ही तिला माहित आहे. ती म्हणते “लेका, उकिरड्याची दैनाबी एकना एक दिवस फिटतेच. तशी ती आपलीबी फिटेन. यातून तिचा दुर्दम्य आशावाद दिसून येतो. बाजारात एका म्हातारीच्या तोंडी आलेलं वाक्य ” गरीबाची इज्जत रस्त्यावर पडलेली असते, ती कुणीही तुडवून जाते.” यातून गरिबांची आगतिकता व असहायता व्यक्त होते. एका ठिकाणी आई म्हणते “चांगली माणसं जोडण्यासाठी अंतःकरणाला डोळे हवेत.” यातून माणसाला अंतरकरणाची भाषा अवगत असावी असं तिला वाटतं. हे संकटांनी भरलेलं जीवन सुसह्य कसं झालं हे सांगतांना भावड्या म्हणतो “आम्ही भावंड जशी एक भाकर सर्वात वाटून खायला शिकलो तसंच खांद्यावर लागलेल्या जू चा भारही वाटून घ्यायला शिकलो.” यातून त्यांची नात्यांची घट्ट वीण व एकमेकांप्रती असलेली सह- संवेदना दिसून येते. अशी साधी, सोपी, सुटसुटीत वाक्ये ही “जू” ची बलस्थाने आहेत. भाषा हे या आत्मकथेचं आभुषण आहे. लासलगाव-चांदवड परिसरातील बोलीभाषा व तिचे शब्द, वाक्प्रचार, म्हणी, लोकगीते यांच्या चपखल वापराने “जू”चं सौंदर्य अधिक खुलून आलं आहे. ते तिच्या अनघड स्वाभाविक स्वरुपात प्रकटले आहे.

यातील काही प्रसंग तर काळजाचा ठाव घेतात. घरगाडा ओढतांना कराव्या लागणाऱ्या कसरतीत आई लासलगावच्या कांद्याच्या खळ्यावर रात्रपाळीचं काम स्विकारते. दूधपिता भावड्या घरी असतो. रात्रीचे अकरा वाजतात. आईचा पान्हा दाटून येतो. ती तशीच काम सोडून लेकासाठी अंधारात घराची वाट धरते. आणि वाट चुकते. पहाटेचे पाच वाजतात. आणि मग घर दिसतं. मायचा उमाळा फुटून निघतो. या प्रसंगात आईची माया मला लेकरासाठी गडाचा बुरुज उतरुन जाणाऱ्या हिरकणीपेक्षा तसूभरही कमी वाटत नाही. एका प्रसंगात भावड्याचा बाप दुसऱ्या बायकोला झालेल्या मुलाचा नवस फेडण्यासाठी भावड्या आणि त्याच्या बहिणींचा लाडका बोकड खाटकासारखा फरफटत ओढून नेतो. तेव्हाचा त्या भावंडांचा आक्रोश वाचकांच्या काळजाला घरे पाडतो. भावड्याची आई अनेक संकटं येतात तेव्हा मनाने खचत नाही तुटत नाही. तीच आई तिची पाळलेली शेळी जेव्हा कुत्री फाडून खातात तेव्हा आंतर्बाह्य हादरून जाते. आपलं सर्वस्व हरवलय अशी तिची व्याकूळता आपल्यालाही आतून हलवून सोडते. हे प्रसंग म्हणजे मानवी भावभावनांचे अत्युच्च दर्शन आहे असे मला वाटते. अश्या प्रसंगांनी “जू” वाचकाला आपलीच कथा वाटते. आणि ती लेखक-वाचकादरम्यान एक अदृष्य बंध निर्माण करते.

“जू” मध्ये पात्रांचा मोठा गोतावळा आहे. भावड्याचं घर, परीसर, गावातील माणसं अशी किमान पन्नासेक माणसं आपणास भेटतात. तरीही त्यांचा गुंता होत नाही हे लेखकाचं यश आहे. इंदूबाई, नामदेव, भावड्या, अक्का, माई, तावडी, पमी, सर्व मेहुणे, आजी, आजोबा, आत्या, फुवा, सावत्र आई, काका, भाऊबंद, भावड्याचे मित्र संतू, पंग्या, गण्या, दिवड्या. गावातील शांताबाई, दुर्गावहिनी, सीतावहिनी, तानाई, जिजामावशी, कौसाई, राधा, वच्छिआक्का, चंद्रभागा, केरसुणी आजी, वेणूआत्या, भोकरडोळ्या अश्या अनेकांशी आपली भेट होते आणि ते मनात घर करुन राहतात.

“जू” चं वैशिष्ट्य असं आहे की ते दुःख उकळत बसत नाही दुःखावर फुंकर घालते. संकटांचा बाऊ करत नाही. संकटांना भिडायला आणि लढायला शिकवते. वेदना मिरवायला नाही तर त्या आतल्या आत जिरवायला शिकवते. हे मांडताना कुठेही कृत्रिमता दिसत नाही. दिसतं ते प्रासादिक हळवंपण. प्रसंगोत्पात निरागसता झळकते. यातल्या शब्दाशब्दांना कष्टातून, श्रमातून आलेल्या घामाचा सुगंध आहे. तो वाचकाला धुंद करतो. लेखक स्वतः एक कवी असल्याने लिखाणातून वेळोवेळी एक निखळ काव्यात्मकता झळकते. “जू” ला पाठबळ देतांना आदरणीय द.ता.भोसले म्हणतात की या लिखाणाला आत्मबळाचे कोंदण आहे. संपत्तीबळ, शस्त्रबळ, शब्दबळ हे अशाश्वत असतात मात्र, आत्मबळ हे श्रेष्ठ व शाश्वत असते. आत्मबळाचे कोंदण असल्यामुळेच हे लिखाण वाचतांना मन हेलावतं, हृदय पिळवटून निघतं आणि काळजाला भेगा पडतात.

ऐश्वर्य पाटेकर हे कवी म्हणून सिध्द झाले आहेत. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. मात्र, त्यांचे हे लिखाण दु:खाच्या प्रदर्शनासाठी अथवा पुरस्कारासाठी केलेलं लिखाण नाही. हे लिखाण आहे मातेच्या कष्टांचे, तिने भोगलेल्या दैन्याचे आणि संकटांशी दिलेल्या लढण्याचे. ते एका मातेचे मंगलगान आहे. आपण कितीही लिहलं तरी आईच्या भोगलेल्या व्यथांना आपण साधा स्पर्शही करु शकणार नाही असं ते मानतात. आईकडून आपण काय शिकलात याचं उत्तर देतांना ते म्हणतात “मातीत गाडून घेतलं तर उगवता आलं पाहिजे, पाण्यात फेकले तर पोहता आलं पाहिजे, वादळात धरलं तर तगता आलं पाहिजे आणि काट्यात फेकले तर फूल होता आलं पाहिजे. हे जगण्याचं सूत्र मी आई कडून शिकलो.” भावड्याच्या आईनं जगण्याचं साधंसुधं तत्वज्ञान दिलं आहे. इतरांच्या पोटात शिरून राहता आलं पाहिजे. माणसांच्या काळजात खोपाकरुन राहता आलं पाहिजे. ज्याच्या पायाशी झुकलो त्यानेच पाठीत बुक्का हाणला तर तो आपला नाही हे ओळखता आलं पाहिजे. त्याचा नाद सोडायचा. जो काळजाला लावेल त्यालाच आपला समजायचं. किती सुलभ तत्वज्ञान आहे या माऊलीचं. म्हणून “जू” हे केवळ एक पुस्तक, आत्मकथा एव्हढं मर्यादित स्वरुपात न राहता “संस्कारांची गाथा” म्हणून ते समोर येतं. कुणी त्याला विद्यापीठाचा दर्जा देतं तर कुणी त्याला मातृभक्तीचं महंन्मंगल स्तोत्र म्हणतं. मला माझ्या अल्पबुध्दीला ती “आईच्या संघर्षाची गोष्ट” वाटते. गोष्टीची गोडी आजही अबालवृध्द, स्त्री-पुरष यांच्यात आबाधीत आहे. ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज संक्रमित होते. पिढ्या, पिढ्यांना जोडते. आणि तोच दर्जा “जू” लाही मिळेल असे मला वाटते. ऐश्वर्य पाटेकर (संपर्क – ९८२२२९५६७२) या सन्मित्राला मी त्यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी आभाळभर शुभेच्छा व्यक्त करतो.

© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
(४२५१०५).
९४२३४९२५९३

0
Posted on

रामायण नव्हे, दक्षिणायन

2+

राम आणि सीता यांचा स्वतंत्र आणि वेगवेगळ्या हेतूने झालेला दक्षिण-प्रवास या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे इथे महत्त्व आहे ते घटनांना, पात्रांना नव्हे.
दक्षिणायन ची सुरुवातच वेगळी आणि आश्वासक आहे. राम/सीता किंवा रावण यांच्या जन्मापासून किंवा मोठ्या काही घटनेतून नांदी न होता ही कथा त्राटिकावधापासून आरंभ होते. कोवळ्या वयातली राम लक्ष्मणाची मनोवस्था अत्यंत तरलपणे चितारत, लेखिका त्या प्रदेशात घेऊन जाते.
राम-रावण संघर्ष केवळ महिलेसाठी नव्हे तर भूभागासाठी झालेला असण्याची शक्यता समर्थपणे व्यक्त होते. रामाच्या विचारशक्तीला दिलेले हे परिमाण अद्भुत आहे. एकदा गृहीतक मांडल्यावर त्याच्या प्रेमात पडून, मग वनवासाला पाठविले जाण्यासारख्या घटनेतही गृहितकाचे धागेदोरे घुसवण्यामुळे कथावस्तूचा पाया किंचित डळमळतो, आणि काही शंका निर्माण व्हायला सुरूवात होते. तरीही, भारत-लंका-दंडकारण्य यांचे भूरेखन (topography) सुस्पष्ट आहे. विशेष म्हणजे त्यासाठी नकाशा दाखवावा लागलेला नाही. युद्धासाठी मदत करणारे वानर, गृद्ध या मानवी जमाती दर्शवल्या आहेत आणि त्यामुळे पौराणिक कथा नव्हे तर इतिहास वाचत आहोत असा भास काही काळ होतो खरा.

चुंबकीय शक्ती असलेले शिवधनुष्य, प्रत्यक्ष शिव, रुद्र यांचे अस्तित्व यांबद्दल लेखिकेच्या ठोस संकल्पना मुळातूनच वाचण्यासारख्या आहेत.

पात्र- आरेखन.

रावण हे पात्र रंगवताना लेखिकेने सत्य, वदंता आणि कर्णोपकर्णी प्रसृत होणाऱ्या कथा यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या घटनेला लोकवाणी कशी वाकवून, विकृत करून सादर करते (उदा. सीतेच्या स्वयंवरात झालेली रावणाची फजिती) हे लेखिका सर्व घटना शक्यतेच्या पातळीवर आणून विशद करते.
रावण किती चांगला, किती वाईट; त्याचं नक्की Continue reading रामायण नव्हे, दक्षिणायन

2+